Hardik Pandya | आयपीएल 2024 साठी पात्र होण्याच्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) आशा वेळेआधीच संपुष्टात आल्या आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई आयपीएल 2024 मधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वीच रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, 2 जूनपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत मुंबई कॅम्पमधील चार खेळाडू भारतीय क्रिकेट संघाकडून खेळतील, ज्यात कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे.
रोहित-आगरकर पांड्याविरुद्ध होते का?
आता टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड होऊन 15 दिवसांनी मोठा खुलासा झाला आहे. दैनिक जागरणच्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने असा दावा केला आहे की कर्णधार रोहित आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासह बीसीसीआयचे काही निवडक 15 सदस्यीय संघात हार्दिक पांड्याचा समावेश करण्याच्या बाजूने नव्हते. या अहवालात असेही म्हटले आहे की, पंड्याला (Hardik Pandya) ‘बीसीसीआयच्या दबावाखाली’ टी-20 विश्वचषकासाठी निवडण्यात आले होते. अहवालात पुढे असा दावा करण्यात आला आहे की, रोहित टी-20 विश्वचषकानंतर टी-20 फॉरमॅट सोडू शकतो.
पंड्याच्या निवडीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते
30 एप्रिल रोजी भारतीय टी-20 संघाची निवड झाल्यानंतर काही दिवसांनी कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली तेव्हाही हा मुद्दा उपस्थित झाला होता. हार्दिकचा खराब फॉर्म असूनही त्याचा संघात समावेश करण्याबाबत मुख्य निवडकर्त्याला विचारण्यात आले. प्रत्युत्तरात, आगरकरने स्पष्ट केले की निवड समितीकडे कोणताही पर्याय नाही कारण सध्याच्या पूलमध्ये हार्दिकला पर्याय उपलब्ध नाही, जो खालच्या ऑर्डरमध्ये स्फोटक फलंदाजी तसेच चार षटकांची मध्यमगती गोलंदाजी करतो.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप