कितीही संकटे येवोत, सर्वसामान्यांच्या भल्यासाठी आमचं काम अखंड सुरु राहील – मुख्यमंत्री

कितीही संकटे येवोत, सर्वसामान्यांच्या भल्यासाठी आमचं काम अखंड सुरु राहील - मुख्यमंत्री

मुंबई – भाजपला राज्यात सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. या घटनेला आता दोन वर्षे पूर्ण होत असून सरकारच्या कामगिरीबाबत महाविकास आघाडीतील नेते समाधान व्यक्त करत आहेत तर विरोधीपाक्षातील नेत्यांनी ठाकरे सरकारची पोलखोल सुरु केली आहे.

वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिला सुरक्षा आदी मुद्द्यांवर म्हणावी तेवढी चांगली कामगिरी सरकारला करता आली नसल्याची टीका विरोधक करत आहेत. तर कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात केलेल्या कामगिरीचा दाखला देत महाविकास आघाडीतील नेते स्वतःच्या सरकारचा बचाव करताना दिसून येत आहेत.

दरम्यान, सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी जनतेचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीत आम्ही विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही. कितीही संकटे येवोत, सर्वसामान्यांच्या भल्यासाठी आमचं काम अखंड सुरु राहील. असे म्हणत महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त उद्धवठाकरे यांनी जनतेला धन्यवाद दिले आहेत.

Previous Post
'शेतकरी, कामगार देशोधडीला लागले आणि ठाकरे सरकारचे प्रमुख नेते डान्स करतायत'

‘शेतकरी, कामगार देशोधडीला लागले आणि ठाकरे सरकारचे प्रमुख नेते डान्स करतायत’

Next Post
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे झाली मात्र अद्याप अनेकांना डायजेस्ट होत नाही - भुजबळ  

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे झाली मात्र अद्याप अनेकांना डायजेस्ट होत नाही – भुजबळ  

Related Posts
Ajit Pawar

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा ओबीसी बांधवांच्या हक्कांचा व महाविकास आघाडीच्या प्रयत्नांचा विजय – अजित पवार

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या अहवाल मान्य करुन त्यानुसार स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्याचा दिलेला आदेश…
Read More
eknath shinde - Uddhav thackeray

मी मुख्यमंत्री झालो तर प्रॉब्लेम काय तुम्हाला? ठाकरेंचा बंडखोरांना सवाल

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांची सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार…
Read More
shinde fadanvis

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर; कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? वाचा संपूर्ण यादी!

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन,…
Read More