मला भाजपकडून कोणत्याही प्रकारचे आश्वासन मिळाले नाही – सदाभाऊ खोत

मुंबई – विधान परिषदेच्या (Legislative Council) 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूक चांगलीच चुरशीची बनली आहे. भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड, (Praveen Darekar, Ram Shinde, Srikant Bharatiya, Uma Khapre and Prasad Lad) शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी (Sachin Ahir and Amsha Padvi), राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे (NCP’s Ramraje Naik Nimbalkar and Eknath Khadse) तर काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे (Bhai Jagtap and Chandrakant Handore)  निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार असून यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीत केलेल्या दमदार कामगिरीमुळे भाजपचा (BJP) आत्मविश्वास वाढला आहे तर त्या निवडणुकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीत अविश्वासाचे वातावरण आहे.

दरम्यान, या निवडणुकीत भाजपच्या पाठींब्यावर मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी अखेरच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. या पार्श्वभूमीवर एबीपी माझा बरोबर बोलताना खोत म्हणाले, पदाचा प्रवास हा अपेक्षा न संपणारा आहे. मला भाजपकडून कोणत्याही प्रकारचे आश्वासन मिळाले नाही. मी लढत राहणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. मात्र, माझ्या मंत्रीपदाच्या काळात मी विविध कामं केली आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्याचे खोत यांनी सांगितले.

या काळात मी धोरणावर काम केले आहे. महापुरातले निकष बदलण्याचं काम केलं. माझ्या काळात मागेल त्याला शेततळं दिले, मागेल त्याला ड्रीप दिले असल्याचे खोत म्हणाले. कोरोनाच्या काळात दुधाचे, कांद्याचे आंदोलन केल्याचे खोत यांनी सांगितले. मंत्रीपदाच्या काळात मी धोरणावर कामं केले. ऊस परिषद घेऊन साखरेचा हमीभाव मागून घेतला. एपआरपीचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. बियाणे हब तयार करण्याची मागणी फडणवीस सरकारनं मंजूर केली होती. मात्र, ठाकरे सरकारनं पुढे काही केल नसल्याचे खोत म्हणाले.