‘जर न्यासा देवगण आर्यन खान सोबत पळून गेली? तर…’, काजोलने दिले असे उत्तर की शाहरुखचं बोलती झाली बंद

Mumbai- काजोल (Kajol) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) हिंदी सिनेमातील पडद्यावरच्या बेस्ट कपलपैकी एक आहेत. पडद्यावर दोघांची जोडी धमाल आणते. पण भविष्यात यांच्या मुलांच्या माध्यमातून दोघांमध्ये काही नातं जोडलं गेलं तर.. एकदा ‘कॉफी विथ करण’च्या एका भागात करण जौहरने शाहरुख-काजोल एकत्र आले असताना दोघांना विचारलं होतं की, जर आर्यन खानने (Aryan Khan) न्यासा देवगणला (Nysa Devgan) पळवून नेलं तर? यावर काजोलने दिलेली प्रतिक्रिया लक्षवेधी होती.

२००७ मधील एका एपिसोडमध्ये होस्ट म्हणून करणने काजोलला विचारलं..’१० वर्षानंतर आर्यन खान न्यासाला घेऊन पळून गेला..आणि हे जेव्हा तुला कळेल तेव्हा तू कशी रिअॅक्ट करशील?’ काजोलनं सेकंदात या प्रश्नाचं उत्तर दिलं, ”मी तर म्हणेन की ‘दिलवाले दूल्हे ले जायेंगे..”

काजोल हे उत्तर देत जोरजारात हसू लागली. शाहरुख देखील हसायला लागला. पण मग तो म्हणाला की या विचारानं देखील मला स्ट्रेस आला आहे.

शाहरुख खान म्हणाला,”मी तर हा विचार करूनच चिंतेत सापडलो आहे. काजोल सोबत नातं जोडायचं या विचारानेच मी घाबरलो आहे”. शाहरुखचं हे बोलणं ऐकून काजोलबरोबरच करण जोहरलाही हसू आवरले नाही.