महाराष्ट्र आणि मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न दिल्ली करत असेल तर तो मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी हाणून पाडवा – जयंत पाटील

मुंबई  – केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालय हे दिल्लीला हलवण्याच्या निर्णय घेतला आहे ही गंभीर बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला.

दरम्यान महाराष्ट्राचे आणि मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न जर दिल्लीतून होत असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तो हाणून पाडावा असा जबरदस्त टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.