‘अजितदादांच्या नेतृत्वात अधिवेशन नागपुरला झाल्यास विदर्भातील महत्वाचे अनेक प्रश्न मार्गी लागतील’

मुंबई – राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 22 ते 28 डिसेंबर दरम्यान मुंबईत होणार आहे.विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला.अधिवेशन कालावधीत लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार असून आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी देखील अनिवार्य करण्यात आली आहे.

पुढच्या कामकाजासंदर्भात 24 डिसेंबरला विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती विधीमंडळ कामकाज मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना दिली.

यानंतर राजकीय तापायला सुरवात झाली आहे. अधिवेशनाला सामोरं जाण्याची सरकारची मानसिकताच नाही,अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी अधिवेशन नागपुरात व्हावं अशी इच्छा बोलून दाखवली आहे. ‘ हिवाळी अधिवेशन नागपुरात व्हावं अशी सर्वांचीच इच्छा आहे, मात्र मुख्यमंत्र्याच्या प्रकृतीचा विषय असल्याने उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वात आणि मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात अधिवेशन नागपुरला झाल्यास विदर्भातील महत्वाचे अनेक प्रश्न मार्गी लागतील.’ असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

Previous Post
Devendra Fadnavis and Uddhav Thakrey

बहुमतात असूनही हिवाळी अधिवेशनाला सामोरं जायला ठाकरे सरकार का घाबरत आहे ?

Next Post
Shambhuraje Desai

आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार – शंभूराजे देसाई 

Related Posts
Sanjay Raut - Eknath Shinde

एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यानंतर राऊतांनी केला दिल्ली दौरा रद्द

मुंबई – विधान परिषदेच्या निकालाने (Results of the Legislative Council) महाविकास आघाडीला (MVA) झटका बसला असून, शिवसेनेतील महत्त्वाचे…
Read More
शक्ती कायदा

राज्यातील महिलांना मिळणार सुरक्षाकवच! विधानसभेत ‘शक्ती कायदा’ एकमतानं मंजूर

मुंबई – राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (आज) विधानसभेत शक्ती कायदा एकमताने मंजूर झाला. विरोधकांकडूनही या कायद्याचे स्वागत…
Read More

‘अजित पवार म्हणजे ‘राजकारणातील सिंह’ असून त्यांना ‘लांडग्या-कोल्हयांच्या’ टोळीत समावेश होण्याची आवश्यकता नाही’

मुंबई – अजित पवार (Ajit Pawar) हे राज्याच्या ‘राजकारणातील सिंह’ आहेत त्यामुळे त्यांना लांडग्या – कोल्हयांच्या टोळीत समावेश…
Read More