केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी पदावर राहता कामा नये, त्यांनी तात्काळ पदावरुन दूर व्हावं – शरद पवार

केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी पदावर राहता कामा नये, त्यांनी तात्काळ पदावरुन दूर व्हावं – शरद पवार

मुंबई : उत्तरप्रदेशच्या लखीमपूर येथील घटनेची माहिती बाहेर आली. सुदैवाने त्याचे व्हिडिओही समोर आले. शांतपणे चाललेल्या शेतकऱ्यांना काही लोक गाडीची धडक देतात, त्यातून हिंसा भडकून तीन-चार लोकांची दुर्दैवाने हत्या झाली. असा प्रकार दुर्दैवाने कधी घडला नव्हता. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भाजपला लगावला आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी एनसीबी, ईडी, आयकर विभाग या यंत्रणांवर भाष्य केलेच शिवाय लखीमपूर हिंसाचारात युपी सरकारवर निशाणा साधला तर बंदमध्ये सहकार्य केलेल्या राज्यातील जनतेचे आभार मानले आणि पक्षाची भूमिकाही स्पष्ट केली.

ही घटना घडल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले की, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा चिरंजीव त्याठिकाणी उपस्थित होता. उत्तरप्रदेश सरकारने मात्र हा दावा फेटाळून लावला. सत्ताधारी पक्षाच्या व्यक्तीवर जरी आरोप असला तरी सत्ताधारी पक्षाने यात काहीतरी भूमिका घेण्याची आवश्यकता होती. मात्र सत्ताधाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेणे, अपराध्यावर कारवाईची उपाययोजना न करणे ही जबाबदारी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना टाळता येणार नाही. तसेच केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी देखील पदावर राहता कामा नये, त्यांनी तात्काळ पदावरुन दूर व्हायला हवे अशी मागणीही शरद पवार यांनी केली.

Previous Post
पाच - पाच वेळेला एका व्यक्तीच्या घरी छापा टाकला हा एक विक्रमच – शरद पवार

पाच – पाच वेळेला एका व्यक्तीच्या घरी छापा टाकला हा एक विक्रमच – शरद पवार

Next Post
आजची मावळची परिस्थिती काय आहे हे समजून घेतले तर देवेंद्र फडणवीस यांच्या ज्ञानात भर पडेल...

आजची मावळची परिस्थिती काय आहे हे समजून घेतले तर देवेंद्र फडणवीस यांच्या ज्ञानात भर पडेल…

Related Posts

जावयामुळे अडचणीत आलेल्या मनोहर जोशींचा राजीमाना बाळासाहेबांनी घेतला होता, आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार ?

मुंबई : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ई़डीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक…
Read More
Amit Shah | औरंगजेब फॅन्स क्लबचे उबाठा अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची टीका

Amit Shah | औरंगजेब फॅन्स क्लबचे उबाठा अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची टीका

Amit Shah | एका बाजूला विरोधी पक्ष पराजित होऊनही विजयाच्या अहंकाराने फुगला आहे, तर दुसरीकडे विजयी होऊनही भाजपाचे…
Read More
jayant patil

मतं तर दाखवूनच द्यायची असतात त्यामुळे कुणी कुणाला पळवण्याचा प्रश्नच येत नाही – पाटील 

मुंबई   – महाविकास आघाडी अडचणीत वगैरे काही नाही. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे त्यामुळे आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी…
Read More