ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढणार 

मुंबई – राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.

सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 इतकी आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 9 (1) मध्ये सुधारणा करून जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 55 व जास्तीत जास्त 85 असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या सुधारणेमुळे सध्याची जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 2000 वरुन  2248 इतकी होईल. त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्यांची संख्या देखील 4000 वरुन 4496 इतकी होईल.

राज्य निवडणूक आयोग, जिल्हयातील निर्वाचक गटांतून थेट निवडणूकीव्दारे निवडून दयावयाच्या सदस्यांची संख्या निश्चित करील. तथापि, एखादया जिल्हा परिषदेच्या प्रादेशिक क्षेत्राची लोकसंख्या आणि निवडणूकीव्दारे भरवण्यात येणाऱ्या अशा जिल्हा परिषदेमधील जागांची संख्या यामधील प्रमाण, शक्य असेल तेथवर, राज्यभर सारखेच असेल.

पंचावन्न निर्वाचक गटांची किमान संख्या, राज्यातील  जिल्हयांमधील कमी लोकसंख्या असलेल्या जिल्हयांसाठी नियतवाटप करण्यात येईल. प्रत्येक जिल्हयाची लोकसंख्या विचारात घेऊन, त्या जिल्हयासाठी पुढील सुत्राचा अंगीकार करुन काढलेल्या प्रत्येक लोकसंख्येसाठी अतिरिक्त निर्वाचक गट असेल.
“क्ष” म्हणजे राज्यातील जिल्हयामधील सर्वात अधिक लोकसंख्या. “वाय” म्हणजे  राज्यातील जिल्हयामधील सर्वात कमी लोकसंख्या उपरोक्त प्रमाणे लोकसंख्यासूत्राच्या आधारे प्रत्येक जिल्हयामध्ये अतिरिक्त निर्वाचक गटांची संख्या निर्धारित करतेवेळी जर लोकसंख्येचा अपूर्णांक अर्धा किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर प्रत्येक अतिरिक्त निर्वाचक गटासाठी तो एक निर्वाचक गट असा हिशेबाबत धरण्यात येईल आणि जर तो अर्ध्यापेक्षा कमी असेल तर, तो दुर्लक्षित करण्यात येईल.

कलम 9 च्या पोटकलम (1) च्या खंड (क) मध्ये निर्धारित केल्याप्रमाणे, कोणत्याही परिस्थितीत, निर्वाचक गटांची एकुण संख्या 85 निर्वाचक गटांपेक्षा अधिक असणार नाही अशी सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post
bacchu kadu

‘मंत्र्याच्या ड्रायव्हरला ४० हजार पगार अन् एसटी कर्मचाऱ्याला फक्त १२ हजार हे चुकीचं’

Next Post
sachin vaze parambir singh

परमबिर सिंह व सचिन वाझे भेटीमागे कोण ? चौकशी झालीच पाहिजे, कॉंग्रेसची मागणी

Related Posts
सूरजच्या आत्महत्येप्रकरणी ठाकरे सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

सूरजच्या आत्महत्येप्रकरणी ठाकरे सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पंढरपूर – राज्यातील शेतकरी विविध संकटांना तोंड देत सावरण्याचा प्रयत्न करत असताना वीज तोडणी करण्याचा सपाटा सरकारकडून लावण्यात…
Read More
विश्वचषकातील खराब प्रदर्शनानंतर पाकिस्तान संघात भूकंप, दिग्गज क्रिकेटरचा राजीनामा

विश्वचषकातील खराब प्रदर्शनानंतर पाकिस्तान संघात भूकंप, दिग्गज क्रिकेटरचा राजीनामा

Pakistan World Cup 2023: भारताने आयोजित केलेल्या ICC एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या साखळी टप्प्यातील सामने संपले आहेत. आता…
Read More
IND VS SL | विराट कोहली बाद होता की नाबाद, थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे श्रीलंकेच्या ड्रेसिंग रूममध्ये गोंधळ

IND VS SL | विराट कोहली बाद होता की नाबाद, थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे श्रीलंकेच्या ड्रेसिंग रूममध्ये गोंधळ (Video)

भारत आणि श्रीलंका (IND VS SL) यांच्यात खेळण्यात आलेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने 241 धावांचे लक्ष्य दिले होते.…
Read More