मुंबईत राष्ट्रवादीनेही केली स्वबळावर लढण्याची तयारी सुरु

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण मुंबईत लढणार नाही परंतु सर्वांनी ठरवलं आम्हाला स्वबळावर लढायचं आहे तर मर्यादित जागांवर लढून जास्त जागा कशा निवडून आणता येईल याबाबत कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करणार असल्याची माहिती मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली.

आज प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई जिल्हाध्यक्ष व प्रभारी आणि नगरसेवकांची बैठक नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मुंबई महानगरपालिकेची फेररचना झाल्यानंतर आज ही बैठक झाली. या बैठकीला सहा जिल्हाध्यक्ष, प्रभारी आणि सहा नगरसेवक उपस्थित होते.

या बैठकीत फेररचना झाल्यानंतर जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांच्या वार्डाची परिस्थिती काय आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात कुठल्या – कुठल्या जागेवर स्वबळावर लढू शकतो याचा अंदाज घेण्यात आला. त्यानंतर १४ फेब्रुवारीला विधानसभानिहाय बैठका घेऊन त्यामध्ये अंदाज घेतला जाईल व इतर पक्षांसोबत बोलणी करुन अंतिम निर्णय वरिष्ठ घेतील असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.