दोन वर्षात महाविकास आघाडीने लोकांना घरी बसवुन लोकांकडून फक्त वसुली केली – चिले

मुंबई – भाजपला राज्यात सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. या घटनेला आता दोन वर्षे पूर्ण होत असून सरकारच्या कामगिरीबाबत महाविकास आघाडीतील नेते समाधान व्यक्त करत आहेत तर विरोधीपाक्षातील नेत्यांनी ठाकरे सरकारची पोलखोल सुरु केली आहे.वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिला सुरक्षा आदी मुद्द्यांवर म्हणावी तेवढी चांगली कामगिरी सरकारला करता आली नसल्याची टीका विरोधक करत आहेत. तर कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात केलेल्या कामगिरीचा दाखला देत महाविकास आघाडीतील नेते स्वतःच्या सरकारचा बचाव करताना दिसून येत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते योगेश चिले यांनी या निमित्ताने हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्ष झाली. या दोन वर्षात कोरोना काळात महाविकास आघाडीने लोकांना घरी बसवुन लोकांकडून फक्त वसुली केली. दामदुपटीने वीजबील वसुली, शाळेच्या फीची वसुली, सगळ्या करांची वसुली, कोरोनाच्या नावाखाली चौपट रकमेची टेंडर काढून वसुली… फक्त वसुली आणि वसुलीच… खर तर यांना महाविकास आघाडी बोलण्यापेक्षा महावसुली आघाडी बोलणे जास्त योग्य आहे अशी टीका चिले यांनी केली आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

माहिती अधिकार कायद्याचा आधार घेत NCB ने ड्रग्स कारवाईची माहिती देण्यास दिला सपशेल नकार!

Next Post
rajesh tope

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार ?, राजेश टोपे यांचे मोठे विधान

Related Posts
Crime News | लग्नाच्या पहिल्याच रात्री शक्तीवर्धक गोळ्या खाऊन पती बनला हैवान, पत्नीचा 7 दिवसांत मृत्यू

Crime News | लग्नाच्या पहिल्याच रात्री शक्तीवर्धक गोळ्या खाऊन पती बनला हैवान, पत्नीचा 7 दिवसांत मृत्यू

Crime News : उत्तर प्रदेशमधील हमीरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या आठवडाभरानंतर नवविवाहितेचा संशयास्पद अवस्थेत उपचारादरम्यान मृत्यू…
Read More
प्रदूषणात घराबाहेर पडत असाल तर 'या' गोष्टींची काळजी घ्या; दुष्परिणामांपासून करा स्वत:चा बचाव

प्रदूषणात घराबाहेर पडत असाल तर ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; दुष्परिणामांपासून करा स्वत:चा बचाव

How To Take Care In Air Pollution: दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या परिसरात प्रदूषणाची पातळी धोकादायक बनली आहे. AQI 400…
Read More
राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा | CM Shinde

राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा | CM Shinde

CM Shinde |  उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याने राज्यातील साखर कारखान्यांना…
Read More