रब्बी पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढवा; जिल्हाधिकाऱ्यांच्या बँकर्स आढावा सभेत सूचना

crop loan

यवतमाळ : बँकांमार्फत जिल्ह्यात सप्टेंबर अखेरच्या तीमाहीपर्यंत 1720 कोटी 20 लाख 87 हजार खरीप पीक कर्जाचे वाटप करून 78 टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. खरीप पीक कर्ज वाटपात जिल्ह्याचे काम चांगले असले तरी रब्बी पीक कर्ज वाटप फार कमी असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बी पीक कर्जवाटपाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बँकर्सना दिल्या.

बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समिती व जिल्हास्तरीय आढावा समितीची माहे सप्टेंबर-2021 अखेरची त्रैमासिक आढावा सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी रिझर्व बँक नागपूरचे राजकुमार जैयस्वाल, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अमर गजभीये, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक दीपक पेंदाम प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की शासकीय योजनांतर्गत मुद्रा लोन, पंतप्रधान स्वनिधी योजना, पंतप्रधान रोजगार योजना, मुख्यमंत्री रोजगार योजना, शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज, तसेच इतर कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मिशन मोडवर काम पुर्ण करावे व प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.बँक क्रेडीट ऑउटरिच कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात 151 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करून महाराष्ट्रात चौथा क्रमांक मिळवल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकर्सचे अभिनंदत कले व यापुढे कर्जवाटपात पहिल्या स्थानाचे लक्ष ठेवून नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी नाबार्ड द्वारे यवतमाळ जिल्ह्याचा वर्ष 2022-23 करिताचा रुपये 5190.90 कोटीचा संभाव्य पत योजनेचा आराखडा सादर करण्यात आला. याचे विमोचन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेअंतर्गत क्षेत्रनिहाय पिक कर्ज आणि कृषी संबधित ईतर कर्ज रु. ३६८४ कोटी, लघु व सुक्ष्म उद्योगाकरिता रु. 860 कोटी व इतर प्राथमिक क्षेत्रासाठी रु 648 कोटी ची तरतूद करण्यात आलेली आहे. जिल्ह्याची वार्षिक कर्ज योजना ही नाबार्डच्या पी. एल. पी. योजनेच्या अनुमानावर आधारित राहत असल्याचे दीपक पेंदाम यांनी यावेळी सांगितले. बैठकीला विविध विभागाचे विभागप्रमुख व बँकांचे प्रतिनिधी उपस्थीत होते.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=FkhUTw1OjTM

Previous Post
Ajit Pawar

समर्थ आणि सशक्त समाज घडविण्यात अंगणवाडी सेविकांचे महत्वाचे योगदान- अजित पवार

Next Post
एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही - नाना पटोले

एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही – नाना पटोले

Related Posts
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८०० यात्रेकरू तीर्थयात्रेसाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे होणार रवाना | Collector Dr. Suhas Diwase

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८०० यात्रेकरू तीर्थयात्रेसाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे होणार रवाना | Collector Dr. Suhas Diwase

Collector Dr. Suhas Diwase | मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८०० यात्रेकरू १० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता…
Read More
काका-पुतणे एकत्र येण्याची आशा? अजित पवारांच्या आईच्या वक्तव्यावर शरद पवार गटाचे नेते काय म्हणाले?

काका-पुतणे एकत्र येण्याची आशा? अजित पवारांच्या आईच्या वक्तव्यावर शरद पवार गटाचे नेते काय म्हणाले?

Mahesh Tapse | महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होऊन आणि मंत्रिमंडळाचे विभाजन होऊनही अनेक मंत्र्यांनी आपल्या खात्यांचा कार्यभार स्वीकारलेला…
Read More
नरहरी झिरवळ यांच्यासह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील जाळीवर उड्या, नेमकं काय झालं?

नरहरी झिरवळ यांच्यासह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील जाळीवर उड्या, नेमकं काय झालं?

Narhari Zirwal | राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये, धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून…
Read More