अश्विन का झाला क्रिश ? वाचा काय घडलं वानखेडेवर !

R.Ashwin

मुंबई : भारत न्यूझीलंड दरम्यान सुरु असलेल्या मुंबई कसोटीच्या तिसर्‍या दिवशी चहापानाच्या वेळेआधीच असा काही प्रकार घडला की ज्याने सगळेच थक्क झाले. खरे तर असे झाले की अश्विनने न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात टॉम लॅथमला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर दुसरा नवा फलंदाज डॅरिल मिशेल फलंदाजीला आला. पण नवीन फलंदाज क्रीझवर येताच मैदानावर चक्कर मारणारा स्पायडर कॅम अचानक नॉन-स्टाईकच्या दिशेला येऊन थांबला.

स्पायडर कॅम फक्त व्हिडीओ बनवण्यासाठी तिथेच थांबला होता, असं सगळ्यांना वाटलं. मात्र स्पायडर कॅम एकाच ठिकाणी बराच वेळ थांबल्याने पंचांनाही आश्चर्याचा धक्का बसला. अशा स्थितीत पंचांनी वेळ लक्षात घेऊन चहाचा ब्रेक पटकन जाहीर केला. स्पायडर कॅमचा दोष नंतर दुरुस्त करण्यात आला. यानंतर चहापानानंतर पुन्हा सामना सुरू झाला.

दुसरीकडे, भारतीय खेळाडूंना स्पायडर कॅम त्यांच्यामध्ये सापडल्याने आश्चर्यचकित झाले आणि ते मस्ती करताना दिसले. विराट कोहलीपासून अश्विनपर्यंत सर्वांनी स्पायडर कॅम सोबत खेळण्याचा मोह आवरला नाही. बीसीसीआयनेही त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

भारताने आपला दुसरा डाव २७६ धावांवर घोषित केला आहे. भारताने न्यूझीलंडला 540 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारतातर्फे मयंक अग्रवालने शानदार ६२ धावा केल्या, पुजारा ४७ शिवाय शेवटच्या क्षणी अक्षर पटेलने धमाका करत नाबाद ४१ धावा केल्या. तर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने ५ बाद १४० धावा केल्या होत्या.

Previous Post
sonu sood

सोनू सूदने पत्नीच्या वाढदिवशी व्यक्त केली भावना; म्हणाला माझे आयुष्य…

Next Post
janvhi kapoor

जान्हवी कपूरचा वन पीस ड्रेस पाहुन युजर्स म्हणाले… ‘बिचारी पँट घालायला विसरली’

Related Posts
केतकी चितळे

माझी साडी खेचली, छातीवर पंच मारला; केतकी चितळेकडून विनयभंगाचा आरोप

मुंबई – अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad…
Read More
आरोग्य क्षेत्रातील संशोधनात सातत्य हवे : आदित्य ठाकरे

आरोग्य क्षेत्रातील संशोधनात सातत्य हवे : आदित्य ठाकरे

पुणे : कोरोना काळात आरोग्य क्षेत्रातील सातत्यपूर्ण नवीन संशोधनाची गरज आपल्या लक्षात आली असून त्यासाठी विशेष प्रयत्न होणे…
Read More
फडतूस नाही, काडतूस आहे म्हणणाऱ्या गृहमंत्र्यांचा दरारा दिसायला हवा होता; जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल

फडतूस नाही, काडतूस आहे म्हणणाऱ्या गृहमंत्र्यांचा दरारा दिसायला हवा होता; जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल

Jayant Patil :- राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र बिहारच्या देखील मागे पडला…
Read More