IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या खास विजयानंतर कोहलीने चाहत्यांसाठी लिहला खास संदेश

IND vs PAK: T20 विश्वचषकात पाकिस्तानला भारताने धूळ चारली आहे.  भारताच्या या विजयाचा हिरो ठरला तो महान फलंदाज विराट कोहली(The great batsman Virat Kohli) . या मॅचमध्ये मॅच विनिंग इनिंग खेळताना त्याने 53 बॉल्समध्ये 82 रन्स केले. त्याचवेळी, पाकिस्तानविरुद्धच्या या शानदार सामन्यातील विशेष विजयानंतर विराट कोहलीने चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत. कोहलीची ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे.

भारताचा महान फलंदाज विराट कोहलीने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या विशेष विजयानंतर त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून चाहत्यांसाठी खास संदेश लिहिला की, एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल आमच्या सर्व चाहत्यांचे आभार. या पोस्टसोबत कोहलीने या सामन्याचे काही खास फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. कोहलीचे हे ट्विट वेगाने व्हायरल होत आहे.(IND vs PAK: Kohli wrote a special message for fans after the special win against Pakistan)

 

१६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली. भारतीय संघाने 31 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. इथून विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांनी समंजस खेळी खेळली. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 82 चेंडूत 113 धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी भारताला विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन गेली.

या सामन्यात बरेच चढ-उतार झाले. कधी पाक संघ सामन्यावर वर्चस्व गाजवत आहे असे वाटले तर कधी भारताचा वरचष्मा दिसला. शेवटच्या 8 चेंडूंवर प्रत्येक क्षणी वातावरण बदलत राहिले. अखेरच्या सामन्यात विराट कोहलीची 53 चेंडूत 82 धावांची नाबाद खेळी कामी आली आणि भारताने हा सामना 4 गडी राखून जिंकला.