न्यूयॉर्क | ( Yojana Patel) भारतानं संयुक्त राष्ट्रसंघात नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा जोरकसपणे उपस्थित करत पाकिस्तानवर थेट आरोप केले आहेत. पाकिस्तान सरकारमधील मंत्र्यांनीच दहशतवाद्यांना प्रशिक्षण व आर्थिक मदत दिल्याची कबुली दिली असून, या कबुलीमुळे पाकिस्तानच दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचं जगासमोर स्पष्ट झालं आहे, असं भारताच्या संयुक्त राष्ट्रांमधील स्थायी प्रतिनिधी योजना पटेल यांनी म्हटलं.
संयुक्त राष्ट्रात बोलताना पटेल ( Yojana Patel) म्हणाल्या, “पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या देशाची वास्तवस्थिती उघड झाली आहे. संपूर्ण जगानं हा कबूलीजबाब ऐकला असून, त्यामुळे पाकिस्तान दहशतवादी कारवायांचा केंद्रबिंदू आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.”
यावेळी योजना पटेल यांनी पहलगाम हल्ल्यानंतर भारताला विविध देशांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. “या कठीण प्रसंगी भारताच्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल आणि दहशतवादाच्या विरोधात एकजूट दाखवल्याबद्दल आम्ही सर्व जागतिक नेत्यांचे आभारी आहोत,” असंही त्या म्हणाल्या.
ही भूमिका घेत भारतानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानच्या दहशतवादमूलक धोरणांवर पुन्हा एकदा लक्ष वेधलं असून, जागतिक समुदायानेही त्याची गंभीर दखल घेतल्याचं दिसत आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, भारतीय लष्कराच्या वेबसाईटवर हॅकिंगचा प्रयत्न
पहलगाम हल्ल्यातील सहा कुटुंबांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी