आरोग्य विभाग परीक्षेतील गोंधळाची एसआयटी मार्फत चौकशी करा – भाजयुमो

आरोग्य विभाग परीक्षेतील गोंधळाची एसआयटी मार्फत चौकशी करा - भाजयुमो

मुंबई – आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळाची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे. युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

या निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य विभागातील परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या गोंधळाला जबाबदार असलेल्या न्यास या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच या कंपनीच्या संचालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी , न्यास ला या परीक्षांचे कंत्राट देण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

याशिवाय अराजपत्रीत पदांच्या परीक्षा यापुढे राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात आदी मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.या शिष्टमंडळात युवती विभाग संयोजिका मिना केदार,विद्यार्थी विभाग संयोजक अक्षय पाटील,प्रदेश सचिव सुजित थिटे तसेच एमपीएससी विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता.

https://www.youtube.com/watch?v=GmVj7hqrh5o&t=1s

Previous Post
चंद्रकांतदादा हल्ली झोपेतही बोलतात असे कानावर आलंय - जयंत पाटील

चंद्रकांतदादा हल्ली झोपेतही बोलतात असे कानावर आलंय – जयंत पाटील

Next Post
आदिवासी विभागातंर्गत येणा-या शाळांना गुणवत्तापूर्ण करण्याचा प्रयत्न - तनपुरे

आदिवासी विभागातंर्गत येणा-या शाळांना गुणवत्तापूर्ण करण्याचा प्रयत्न – तनपुरे

Related Posts
नाना पटोले

देशातील ज्वलंत प्रश्नांची फक्त काँग्रेसला चिंता, जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारला जाब विचारू : नाना पटोले

मुंबई – देशातील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. रुपयाची दररोज घसरण होत आहे,महागाई व बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे.…
Read More
Malhar Patil | देवा-धर्माबद्दल बोलायचं नाही, तुझी हुजरेगिरी राहुल गांधींसमोर; अर्चना पाटलांच्या मुलाचा ओमराजेंवर हल्लाबोल

Malhar Patil | देवा-धर्माबद्दल बोलायचं नाही, तुझी हुजरेगिरी राहुल गांधींसमोर; अर्चना पाटलांच्या मुलाचा ओमराजेंवर हल्लाबोल

Malhar Patil | जय श्री राम बोलल्यावर आपल्या अंगावर जो शहारा येतो, तो आपल्या आस्मितेचा, आपल्या धर्माचा विषय…
Read More
Jagdish_Mulik

पुणे : भाजपचे महापलिकेतील संख्या बळ वाढून ते ११० च्या पुढे जाईल – मुळीक 

पुणे : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.…
Read More