‘शेतकऱ्यांना हे कायदे पूर्ण समजले म्हणूनच इतकं मोठं आंदोलन झालं’

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. त्यात नुकतीच त्यांनी तीन कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केली तसेच देशाची माफीही मागीतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाश पर्व सोहळ्याचं निमित्त साधून देशाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देताना तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘शेती कायदे शेतकऱ्यांना समजवून सांगण्यात आम्ही कमी पडलो असं पंतप्रधान म्हणतात. वास्तविक, शेतकऱ्यांना हे कायदे पूर्ण समजले म्हणूनच इतकं मोठं आंदोलन झालं. शेतकरी एकजुटीचा विजय असो !!!’ अस जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

आमचं सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी पावलं उचलत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक सुधारावी आणि त्यांची सामजिक स्थिती चांगली व्हावी म्हणून इमानदारीने काम करत आहोत. आम्ही त्यासाठी तीन कृषी कायदे आणले होते. देशातील छोट्या शेतकऱ्यांना बळ मिळावं. त्यांना पिकांना योग्य दाम मिळावा आणि उत्पादन विक्रीसाठी बाजार मिळावा हा त्यामागचा हेतू होता. ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती. अनेक सरकारांनी यापूर्वी त्यावर मंथन केलं होतं. यावेळीही संसदेत चर्चा झाली आणि कायदा आणला. देशातील कोट्यावधी शेतकरी आणि संघटनांनी त्याचं स्वागत केलं. मी त्यांचा आभारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.

https://youtu.be/3AmlxDP4tcU

Previous Post

शेतकऱ्यांनी मोदींना झुकवलं, अखेर वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची मोदी सरकारला उपरती!

Next Post

‘जुलमी सरकार झुकताना पाहायला आज राजीव सातव हवे होते’

Related Posts
amol mitkari

सदाभाऊ म्हणाले पवारांचं आडनाव आगलावे करा; मिटकरी म्हणाले, महान सूर्यावर थुंकण्याचा …

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री सदाभाऊ खोत विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला असल्याचे दिसून येत आहे.…
Read More
Narendra Modi | पंतप्रधानांनी स्वत: ट्रॉफी न घेता रोहित आणि द्रविडच्या हाती सोपवली, नरेंद्र मोदींच्या कृतीचं होतंय कौतुक

Narendra Modi | पंतप्रधानांनी स्वत: ट्रॉफी न घेता रोहित आणि द्रविडच्या हाती सोपवली, नरेंद्र मोदींच्या कृतीचं होतंय कौतुक

Narendra Modi | भारतीय संघाने 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण…
Read More
Kalicharan Maharaj

शिंदे साब बढीया काम कर रहे है; कालीचरण महाराजांनी केले मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक 

पुणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात नवी सरकार उदयास आले आहे. हिंदुत्वाचा (Hinduism)…
Read More