ऑफिसला या… नको चहा.. आता गुळ – पाणी प्या….!!

ऑफिसला या... नको चहा.. आता गुळ - पाणी प्या....!!

लातूर दि.27 (जिमाका) : बदलत्या जीवन शैलीत आहारात मोठ्या प्रमाणात बदल झाले… जंक फूडच्या जमान्यात… शरीरात मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक जात असल्यामुळे वाढते पित्तदोष हे आजच्या धावपळीच्या जीवनात वारंवार होणारा विकार होऊन बसला आहे. यात चहाचे वाढते सेवन हे या विकाराला बळ देत आहे. हे लक्षात घेऊन आज पासून जिल्हा माहिती कार्यालयात ‘नको चहा.. आता गुळ पाणी प्या’ असा पाहुणचार होणार आहे.

जिल्हा माहिती कार्यालय हे प्रसार माध्यमातील लोकांचा राबता असलेलं शासकीय कार्यालय….प्रसार माध्यमं हे ओपिनियन लीडर आहेत… आज पर्यंतच्या बदलाचे सर्वात मोठे हक्कदार माध्यम आहेत… त्यामुळे नवीन सुरुवात गुळ पाणी सुरु करत आहोत.

वारंवार शरीरात कॅफीन घालून पित्तदोष ( एका कपात 10 मिली ग्रॅम एवढे कॅफीन असते ) वाढविण्यापेक्षा आता शरीराला पोषक असलेला सेंद्रिय गुळ, तांब्याच्या भांड्यातले वाळे घातलेले पिण्याचे पाणी हा जुन्या काळातला नवा पाहुणचार या कार्यालयात सुरु करत आहोत.

जुन्या काळात पिण्याचे पाणी फक्त तांब्याच्या भांड्यातून पीत असत म्हणून पाणी पिण्याच्या भांड्याचे नावच तांब्या पडले. गुळ पाणी तर आता आता पर्यंत पाहूणचाराची पद्दत आपल्याकडे होती.

त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हे गुळ, तांब्याच्या भांड्यातले पाणी आणि वाळा ही अत्यंत गुणकारी वनस्पती असलेले पाणी आम्ही सुरु केले आहे.

https://www.youtube.com/watch?v=GmVj7hqrh5o

Previous Post
अतिवृष्टी बाधित बीड जिल्ह्याला मराठवाड्यात सर्वाधिक मदत; शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

अतिवृष्टी बाधित बीड जिल्ह्याला मराठवाड्यात सर्वाधिक मदत; शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

Next Post
प्रत्येक गड-किल्ल्यांच्या विकासासाठी आराखडा तयार करा – उद्धव ठाकरे

प्रत्येक गड-किल्ल्यांच्या विकासासाठी आराखडा तयार करा – उद्धव ठाकरे

Related Posts
Amol Kolhe | अहो पोटी जन्माला येण्यापेक्षा निष्ठेने वागणं खूप महत्त्वाचं - खासदार अमोल कोल्हे

Amol Kolhe | अहो पोटी जन्माला येण्यापेक्षा निष्ठेने वागणं खूप महत्त्वाचं – खासदार अमोल कोल्हे

खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवाराणवर खोचकपणे अप्रत्यक्ष टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी…
Read More

‘अल्पसंख्याक, मुलींसाठीचे, डोंगराळ वस्तीत आणि आदिवासी भागात महाविद्यालयाबाबतचे निकष निश्चित करणार’

मुंबई : राज्यात आगामी काळात महाविद्यालयांना शासनाची परवानगी देताना काही निकष ठरवण्यात येत आहेत. अल्पसंख्याक, मुलींसाठीचे, डोंगराळ वस्तीत…
Read More
राहुल द्रविडचा मुलगा अन्वयने पुन्हा झळकावले शतक, ४५९ धावा करून नंबर १ बनला

राहुल द्रविडचा मुलगा अन्वयने पुन्हा झळकावले शतक, ४५९ धावा करून नंबर १ बनला

Anvay Dravid | राहुल द्रविडचे दोन्ही मुलगे सध्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये नाव कमावण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत. या प्रयत्नात,…
Read More