शरद पवार यांच्याबद्दल ‘तसं’ बोललोच नाही, जयंत पाटील यांचा घुमजाव 

Jayant Patil  : राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणणाऱ्या एका मोठ्या घटनेची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फार मोठं वक्तव्य केलं आहे.  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी ही पवारांची (Sharad Pawar) खेळी असू शकते, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येवू लागल्या तसेच पवारांच्या भूमिकेबाबत देखील उलटसुलट चर्चा होऊ लागल्या. यानंतर बढाई मारण्याच्या नादात आपल्याच नेत्याला अडचणीत आणल्याचे लक्षात आल्यानंतर आता जयंत पाटील यांची दुसरी प्रतिक्रिया आली असून आता मात्र त्यांनी सारवासारव केली आहे.

शरद पवार यांची खेळी हे असं बोललो नाही. ते गेस केलं होतं. जो घटनाक्रम बघितला होता आणि त्या घटनाक्रमाचा फायदा हे राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी होता. त्यामुळे पवार साहेबांनी ते जाणून बुजून केलं असं म्हणता येत नाही. असं पाटील यांनी आता म्हटले आहे.