‘गांधीजीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारा आणि नथुरामजी गोडसे म्हणणारा गुणरत्न सदावर्ते हा मूर्ख माणूस’

सांगली – एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte) यांनी ‘एसटी कष्टकरी जनसंघ'(ST Kashtakari Jansangh)  या संघटनेची स्थापना केली असून त्यांनी याबाबत काल अधिकृत घोषणा केली. दरम्यान, यावेळी गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली असे ते म्हणाले.

नथुराम गोडसे यांनी हे सांगितलं होतं की महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी मरताना हे राम म्हटलं नव्हतं ते एवढ्यावरच थांबले नाही तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा (Nathuram Godse) नथुरामजी असा उल्लेख केला आहे.  त्यांच्या अशा बेजबाबदार वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, या मुद्द्यावरून आता मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सदावर्ते यांना लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, गांधीजीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारा आणि त्यावेळी नथुरामजी गोडसे म्हणणारा गुणरत्न सदावर्ते हा मूर्ख माणूस आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला करवताना सदावर्ते मधील नथुराम गोडसे जागा झाला होता अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील ईदगाह मैदान (Idgah Maidan) परिसरातील सभागृह बांधकाम शुभारंभ प्रसंगी आव्हाड हे बोलत होते. गुणरत्न सदावर्तेच वक्तव्य ऐकलं की घृणा वाटते आणि किळस येते. देशातील पहिला आतंकवादी असणारा नथुराम गोडसे याला सदावर्ते हा गोडसेजी म्हणतोय, अशी टीकाही आव्हाड यांनी केली.