Kiran Kumar Reddy joins BJP : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा उभारी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसला दक्षिण भारतात दुसरा मोठा झटका बसला आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री ए. के. अँटनी यांच्या मुलानंतर आता आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.अविभाजित आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री राहिलेल्या किरण कुमार रेड्डी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.
पक्षात प्रवेश घेतल्यानंतर लगेचच भाजपच्या मुख्यालयात पत्रकारांना संबोधित करताना किरण म्हणाले, काँग्रेस लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि हायकमांडच्या चुकीच्या निर्णयांमुळे पक्षाचे राज्या-राज्यात विभाजन होत आहे. ही एका राज्याची बाब नाही, जवळपास सर्वच राज्यांची स्थिती तशीच आहे.
पत्रकारांना संबोधित करताना किरण म्हणाले, मी काँग्रेससाठी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्ष लोकांचे मत समजून घेऊ शकत नाही. काँग्रेस पक्ष ना चूक काय आहे याचे विश्लेषण करत आहे ना त्यांना दुरुस्त करायचे आहे. तो बरोबर आहे आणि देशातील लोकांसह इतर सर्वजण चुकीचे आहेत असे त्याला वाटते. याच विचारसरणीमुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या निर्णयामुळे त्यांच्या राज्य युनिटला बरेच राजकीय नुकसान सहन करावे लागले. याच्या निषेधार्थ पक्षाच्या अनेक प्रमुख नेत्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्या एका निर्णयाचा दुष्परिणाम असा झाला की, त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आंध्र प्रदेशात लोकसभेची एकही जागा जिंकता आलेली नाही.