‘ठाण्यातील नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वकाही दिले पण याच लोकांनी ऐनवेळी धूम ठोकली’

Jayant Patil

ठाणे – या भागात पवारसाहेबांच्या विचारांची नेहमीच पकड राहिली आहे. मात्र पक्षाने मोठे केलेले लोक आज सत्तेसाठी पक्ष सोडून गेले, जे सोडून गेले त्यांच्याबाबत चर्चा करून वेळ वाया घालवणाऱ्यांपैकी मी नाही असे सांगतानाच उलटपक्षी पुन्हा नव्याने बुरुज उभा करण्याकडे आपल्याला लक्ष केंद्रीत करायला हवे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

कोणीही पक्ष सोडून गेला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून यायला हवा अशी संघटनात्मक रचना आपण केली पाहिजे. बुथ कमिट्यांवर आपल्याला लक्ष केंद्रित करायला हवे. बुथ कमिट्या जर मजबूत असेल तर कोणीही आपला पराभव करू शकणार नाही असेही जयंत पाटील म्हणाले.२०१९ ला ज्यांच्या बुथ कमिट्या मजबूत होत्या त्यांना विजय मिळाला. थोड्याबहुत मतांच्या फरकाने जे पराभूत झाले त्यांचा पुढच्या वेळी विजय निश्चितच होणार अशी खात्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

६०-७० वर्षात देशाने जे कमवले त्याला विकण्याचा रितसर कार्यक्रम केंद्रसरकारतर्फे केला जात आहे. जनतेचे शोषण सुरू आहे, याचे प्रबोधन लोकांमध्ये करायला हवे आणि हे करण्यासाठी आपल्याला सैन्य लागेल. ते सैन्य आपण उभे करूया आणि केंद्रसरकारचे अपयश घराघरात पोहोचवा असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

आज तरुण कार्यकर्ते आपल्या सोबत उभे आहेत. याच तरुणाईच्या जोरावर आपण इथला निकाल पुढच्या काळात बदलून टाकू. ही कुस्ती आपणच जिंकू आणि विरोधकांना पार चितपट करू असा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. ठाण्यातील नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वकाही दिले पण याच लोकांनी ऐनवेळी धूम ठोकली. किसन कथोरे असतील, कपिल पाटील असतील यांना महत्त्वाची पदे दिली तरी पक्ष सोडून गेले. अशा लोकांना धडा शिकवणे गरजेचे आहे. त्यासाठी ही परिस्थिती बदलायची आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

हे ही पहा:

https://www.youtube.com/watch?v=-5evygBC4NY

Previous Post
भाजप लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करतेय; जयंत पाटलांची टीका

भाजप लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करतेय; जयंत पाटलांची टीका

Next Post
नेता असावा तर असा : महत्वाची सर्व कामे बाजूला ठेवत छगन भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला 

नेता असावा तर असा : महत्वाची सर्व कामे बाजूला ठेवत छगन भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला 

Related Posts
माळीणची पुनरावृत्ती : इर्शाळवाडी गावावर दरड नव्हे दु:खाचा डोंगर कोसळला,संपूर्ण देश हादरला

माळीणची पुनरावृत्ती : इर्शाळवाडी गावावर दरड नव्हे दु:खाचा डोंगर कोसळला,संपूर्ण देश हादरला

रायगड – रायगड जिल्ह्यात खालापूर इथं इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला,…
Read More
भर मैदानात रिषभ पंतने खेचले कुलदीपचे हेल्मेट, भारतीय खेळाडूंचा व्हिडिओ व्हायरल | Rishabh Pant

भर मैदानात रिषभ पंतने खेचले कुलदीपचे हेल्मेट, भारतीय खेळाडूंचा व्हिडिओ व्हायरल | Rishabh Pant

भारताचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) जेव्हा मैदानात येतो तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्याकडे असतात. त्याची केवळ फलंदाजीच…
Read More
सारथीमार्फत दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी नि:शुल्क प्रशिक्षणाचे आयोजन

सारथीमार्फत दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी नि:शुल्क प्रशिक्षणाचे आयोजन

Civil Judge | छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्यामार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी…
Read More