काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर आपली भूमिका स्पष्ट करायला हवी; सिद्धूंची मागणी
चंडीगड – 2022 च्या पंजाब निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अडचणी आणखी वाढत असल्याचे दिसते आहे. यापूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या बंडखोरीनंतर विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील परस्पर वाद चव्हाट्यावर आला होता, जो पक्षाच्या हायकमांडने हाताळला होता. पण आता जुन्या पक्षाला तोंड फुटू लागला आहे.
सिद्धू यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षावर हल्ला चढवला असून, 2022 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. सिद्धूने खिल्ली उडवताना वराशिवाय कसली मिरवणूक? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
मागील अशांततेच्या दिवसांचा संदर्भ देत ते म्हणाले की, संकटातून बाहेर पडण्यासाठी योग्य मुख्यमंत्री आवश्यक आहे असं ते म्हणाले. सोबतच चन्नी यांनी जाहीर केलेल्या अनेक मोफत सुविधांचा खरपूस समाचार घेत सिद्धू म्हणाले, प्रत्येकजण घोषणा करतात, पण ते शक्य होत नाही. वित्तीय तूट बघा. आर्थिक परिस्थितीनुसार घोषणा व्हायला हव्यात.