‘२०२४ला महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या’, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अभिजीत बिचुकले स्पष्टच बोलले

बिग बॉस फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एकदा एक वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील सुरू असलेल्या राजकारणावर बोलताना, राज्यातील सगळे पक्ष घरी बसवा आणि २०२४ला महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या, असं त्यांनी यावेळी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाले की, “मी लोकशाही मानणारा नागरिक आहे. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी तिथे जातात. मला अद्याप लोकांनी निवडून दिलं नाही. त्यामुळे येत्या काळासाठी मी एवढंच सांगेन की, जे झालं ते पुरेसं झालं.”

“आता हे कुणीही असतील शिवसेना उद्धव ठाकरे गट असो वा शिवसेना एकनाथ शिंदे गट असो, जे कुणी असेल त्या सगळ्या पक्षांना एकदा घरीच बसवा. अभिजीत बिचुकले तुम्हाला एक चांगला पर्याय म्हणून आला आहे. असलं राजकारण थांबवायचं जनतेच्या हातात आहे. तुम्ही २०२४ मध्ये महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या” असं अभिजीत बिचुकले यांनी म्हंटलं आहे.

अभिजीत बिचुकले यांच्या या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या या व्यक्तव्यानंतर पुन्हा एकदा ते ट्रोल होत आहेत.