निखील वागळे यांनी केली वाह्यात विधानं करणाऱ्या महाराष्ट्रातल्या व्यक्तींची यादी; पहा कुणाकुणाचा आहे समावेश

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणि नेते यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध मनसे असा सामना रंगल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, एकमेकांवर टीका करताना हे नेते अनेकदा पातळी ओलांडत असल्याचे देखील दिसून येते.

खासदार संजय राऊत, राणे पिता-पुत्र हे यात आघाडीवर असल्याचे दिसून येते. खासदार संजय राऊत यांचा तर हल्ली जिभेवर ताबा राहिला आहे कि नाही असा सवाल उपस्थित करावा अशी परिस्थिती आहे. कारण ते अनेकदा माध्यमांच्या समोर ते विरोधीपक्ष आणि नेत्यांना शिवीगाळ करताना दिसून आले आहेत.

याशिवाय आणखी काही नेते देखील आपली मर्यादा ओलांडून एकमेकांवर टीका करत असल्याचे दिसून येत आहे. नेमका हाच धागा पकडून पत्रकार निखील वागळे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. यात त्यांनी वाह्यात विधानं करणाऱ्या महाराष्ट्रातल्या व्यक्तींची यादी केली असून अनेक दिग्गज व्यक्तींचा यात समावेश आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात वाह्यात विधानं करणाऱ्या महाराष्ट्रातल्या व्यक्तींची यादी करतो आहे. तुम्हीही यात भर घालू शकता. तुम्ही ही यादी वाढवू शकता. कमेंटमध्ये लिहा, पण सभ्यपणे. कुणाला गंभीरपणे घ्यायचं नाही हे तरी कळेल!

वागळे यांनी केलेली यादी पुढील प्रमाणे

१) संभाजी उर्फ मनोहर भिडे, २) इंदुरीकर महाराज, ३) उदयन भोसले, ४) संजय राऊत, ५) चंद्रकांत पाटील , ६) किरीट सोमय्या, ७) रामदास आठवले , ८) गोपीचंद पडळकर, ९) नारायण राणे आणि त्यांची मुलं , १०) अमृता फडणवीस, ११) तृप्ती देसाई, १२) वारीस पठाण , १३) राम कदम, १४)अतुल भातखळकर, १५) गुणरत्न सदावर्ते, १६) रवी आणि नवनीत राणा या व्यक्तीचा या यादीत समावेश आहे.