मुंबई | ( Marathi language) महाराष्ट्रातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय अनिवार्य करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सुमारे २० सामाजिक संस्था आणि संघटनांनी हिंदी अनिवार्यतेविरोधात मोहीम उघडली असून, हजारो नागरिकांनी याला पाठिंबा दर्शवला आहे.
या मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन नोंदणीला सोमवारपर्यंत तब्बल ८ हजारांहून अधिक व्यक्तींनी विरोध नोंदवला आहे. आंदोलकांचा ठाम दावा आहे की, “तिसरी भाषा पहिलीपासून अनिवार्य करू नये, आणि करायचीच असेल तर उत्तर भारतातील राज्यांमध्ये प्रथम मराठी ( Marathi language) किंवा अन्य द्रविड भाषांना अनिवार्य करावे.”
या संघटनांनी मांडलेली प्रमुख भूमिका अशी आहे की, मराठी भाषेच्या अस्मितेला आणि स्थानिक भाषांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. केवळ हिंदीला प्राधान्य देणे म्हणजे भाषिक असमतोल वाढवणे व केंद्रसत्तेचा एकतर्फी हस्तक्षेप असल्याचा आरोप करण्यात येतो आहे.
या आधीही हिंदीला लादण्याच्या प्रयत्नांना महाराष्ट्रात विरोध झाला असून, आता पुन्हा एकदा मराठी भाषिकांनी सामूहिक पातळीवर आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.सरकारने या मुद्द्यावर काय भूमिका घेतली, याकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
“मी गोमूत्र खूप पितो”, नितेश राणेंचं विधान चर्चेत
काँग्रेस सोडण्याची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी सगळंच सांगितलं | Sangram Thopte
२६/११ हल्ल्यामागे काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात, भाजप नेत्याचा गंभीर आरोप