Mallikarjun Kharge | भाजपाचे अब की बार ४०० पार सोडा, देशभरातून ४० जागाही येणार नाही

Mallikarjun Kharge | भाजपाचे अब की बार ४०० पार सोडा, देशभरातून ४० जागाही येणार नाही

Mallikarjun Kharge | काँग्रेस पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले व देशाला स्वातंत्र मिळवून दिले, भारतीय जनता पक्षाने देशासाठी काय केले असा प्रश्न विचारत निवडणुकीत विकासाच्या कामावर मते मागितली पाहिजेत पण पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करणारी विधाने करत आहेत. उठसूट मुघल, मुस्लीम व मंगळसूत्र हीच भाषा वापरतात आणि अब की बार ४०० पार चा नारा देतात. देशातील चित्र बदलले आहे अब की ४०० पार नव्हे तर भाजपाला देशभरातून ४० जागाही मिळणे अवघड आहे, असा हल्लाबोल काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी केला आहे.

इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी धुळे येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत खर्गे बोलत होते. भाजपा व मोदी सरकारचा समाचार घेत ते पुढे म्हणाले की, भाजपा, आरएसएस व नरेंद्र मोदी यांना ४०० जागांचे बहुमत मिळवून संविधान संपवायचे आहे. २०१५ मध्येच संविधान बदलण्याची जाहीर भाषा करण्यात आली होती. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आरक्षणाची समिक्षा करण्याचे जाहीरपणे सांगितले आहे, आताही भाजपा खासदार संविधान बदलणार असल्याचे बोलत आहेत. संविधान बदलले तर दलित, मागास, गोरगरिब लोकांचे आरक्षण व मुलभूत हक्क हिरावून घेतल जाणार आहेत. संविधानाचे रक्षण केले नाही तर जनतेचे नुकसान होणार आहे. भाजपाचा हा डाव कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ द्यायचा नसेल तर भाजपाचा पराभव करून इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आणा असे आवाहन खर्गे यांनी केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Shrikant Shinde | पातळी सोडण्यास भाग पाडू नका, श्रीकांत शिंदे यांचा उबाठाला इशारा

Shrikant Shinde | पातळी सोडण्यास भाग पाडू नका, श्रीकांत शिंदे यांचा उबाठाला इशारा

Next Post
Shashi Tharoor | देशभरातील हवा बदलली, ४ जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार

Shashi Tharoor | देशभरातील हवा बदलली, ४ जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार

Related Posts
Pravin Tarde

५० डिग्री तापमानात चित्रित झाला ‘बलोच’; प्रविण तरडे यांचा अनुभव एकदा जरूर वाचा

Mumbai – पानिपतच्या लढाईत मराठ्यांना पराभव पत्कारून परक्यांची गुलामगिरी स्वीकारावी लागली. याच भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा ‘बलोच’ चित्रपट…
Read More
Pune Loksabha | दोन लाख पुणेकरांनी घेतल्या ‘व्होटिंग स्लिप’, मोहोळ यांच्या प्रभावी यंत्रणेचा नागरिकांना फायदा

Pune Loksabha | दोन लाख पुणेकरांनी घेतल्या ‘व्होटिंग स्लिप’, मोहोळ यांच्या प्रभावी यंत्रणेचा नागरिकांना फायदा

Pune Loksabha | मतदानासाठी नागरिकांच्या ‘उत्साहा’बाबत सातत्याने चर्चा होत असतानाच महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या संपर्क…
Read More
Rohit_Sharma

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेच्या तारखा जाहीर, संपूर्ण वेळापत्रक ‘असे’ आहे 

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी आगामी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia and South Africa)…
Read More