Mallikarjun Kharge | काँग्रेस राम मंदिरावर बुलडोझर चालवेल हा मोदींचा आरोप भ्रम निर्माण करणारा, खर्गेंचा पलटवार

Mallikarjun Kharge | काँग्रेस राम मंदिरावर बुलडोझर चालवेल हा मोदींचा आरोप भ्रम निर्माण करणारा, खर्गेंचा पलटवार

Mallikarjun Kharge | नरेंद्र मोदींचे राजकारण विश्वासघाताचे आहे, संविधानाला धाब्यावर बसवून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणेकडून विरोधकांना धमकी देऊन, आमिषे देऊन पक्ष फोडले व सरकारे पाडली. खऱ्या राजकीय पक्षाचे चिन्ह भाजपाला पाठिंबा देण्याऱ्या पक्षाला दिले, हे सर्व नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावरच झाले आहे. नरेंद्र मोदींनी सातत्याने समाजाला तोडण्याची भाषा केली. लोकांना भडकावण्याचे काम केले आहे, असा पंतप्रधान देशात आजपर्यंत झाला नाही, असा हल्लाबोल काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी केला आहे.

हॅाटेल ग्रॅंड हयात येथे इंडिया आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मल्लीकार्जून खर्गे बोलत होते, ते पुढे म्हणाले की, देशातली जनता भाजपाच्या कारनाम्यांवर, तोडफोड नितीवर नाराज आहे. भाजपाच्या तोडफोड नितीविरोधात व अत्याचारी कारभाराविरोघात इंडिया आघाडी लढत आहे. देशातील वातावरण इंडिया आघाडीसाठी अनुकूल आहे. इंडिया आघाडीला महाराष्ट्रात ४८ पैकी ४६ जागा मिळतील व देशात सरकार स्थापन करु अशा विश्वास खर्गे यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस पक्षाने ५ न्याय २५ गॅरंटी दिल्या आहेत. ३० लाख सरकारी नोकऱ्या, महालक्ष्मी योजने अंतर्गत गरिब महिलांना दरवर्षी १ लाख रुपये, २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा, शेतीवरचा जीएसटी हटवणार, कर्जमाफी देणार, जीएसटी बदलून नवीन सरळ जीएसटी आणणार ज्याचा एकच दर असणार. युपीए सरकारने आणलेल्या अन्न सुरक्षा कायद्यानुसार गरिब लोकांना महिन्याला १० किलो धान्य मोफत दिले जाईल, असेही खर्गे म्हणाले.

एका प्रश्नाला उत्तर देताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आली तर अयोध्यातील राम मंदिरावर बुलडोझर चालवतील हा मोदींचा आरोप जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. बुलडोझर संस्कृती भाजपाची आहे काँग्रेसची नाही आणि काँग्रेस असे काहीही करणार नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Mallikarjun Kharge | पंतप्रधान मोदींची भाषा समाजाला तोडण्याची, महाराष्ट्रात आम्ही ४६ जागा जिंकू

Mallikarjun Kharge | पंतप्रधान मोदींची भाषा समाजाला तोडण्याची, महाराष्ट्रात आम्ही ४६ जागा जिंकू

Next Post
Sharad Pawar | अन्न सुरक्षा कायदा डॉ. मनमोहनसिंह सरकारचा, नरेंद्र मोदींचा आरोप चुकीचा

Sharad Pawar | अन्न सुरक्षा कायदा डॉ. मनमोहनसिंह सरकारचा, नरेंद्र मोदींचा आरोप चुकीचा

Related Posts

‘कसोटी क्रिकेटचा बादशहा’ बनला भारत! ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत टेस्ट रँकिंगमध्ये अव्वलस्थानी विराजमान

नवी दिल्ली- बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) सहा गडी…
Read More
अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ मोबाईल पाहणे आरोग्यासाठी घातक? वाढू शकतो 'या' आजारांचा धोका

अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ मोबाईल पाहणे आरोग्यासाठी घातक? वाढू शकतो ‘या’ आजारांचा धोका

फोन वापरून तुम्ही टेक्नॉलॉजीच्या बाबतीत अपडेट राहता, पण कुठेतरी यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मोबाईल फोन तासनतास…
Read More
Two Wheeler Care Tips: बाईक आणि स्कूटरची काळजी घेणे आहे महत्त्वाचे! 'या' 6 गोष्टी लक्षात ठेवा

Two Wheeler Care Tips: बाईक आणि स्कूटरची काळजी घेणे आहे महत्त्वाचे! ‘या’ 6 गोष्टी लक्षात ठेवा

Two Wheeler Care Tips: हिवाळ्यात स्वतःची काळजी घेण्याबरोबरच आपण आपल्या वाहनांची देखील विशेष काळजी घेतली पाहिजे. तुम्ही कारच्या…
Read More