भाजपची सुपारी घेऊन मराठी माणसाच्या मुळावर येऊ नका; मनीषा कायंदे यांची राज ठाकरेंवर टीका

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park)पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर तसेच महाविकास आघाडीला देखील फैलावर घेतले. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या ढोंगीपणाचा अक्षरशः बुरखा फाडला.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या नावाखाली मतदारांची कशी फसवणूक झाली हे सप्रमाण सांगितले. सोबतच स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे ठामपणे हिंदूंच्या बाजूने आपण उभे राहणार आहोत असे देखील संकेत दिले. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था आदी प्रश्नांवरून महाविकास आघाडीचे वाभाडे काढले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेली टीका शिवसेनेला झोंबली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे (manisha kayande) यांनी ट्विट करत म्हटलंय, भाजपच्या ‘प्रवक्त्यांनी’ केलेली सभा पाहिली. भाजपची बी टीम एमआयएम होती ते माहित होते, भाजपची सी टीमपण आहे हे आज दिसले. आधी आपला रंग ठरवा, मग दिशा ठरवा. भाजपची सुपारी घेऊन मराठी माणसाच्या मुळावर येऊ नका.