हे सरकार शकुनी काकांच्या इशाऱ्यावर चालतं – पडळकर

आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर भाजपा आणि ओबीसी नेते यांनी राज्य सरकारवर ठिकेची झोड उठविली आहे.आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. हे सरकार शकुनी काकांच्या इशाऱ्यावर चालणारे सरकार आहे. त्यामुळे आता राज्यात आणखी एक वाद पेटला आहे.महाविकास आघाडी आणि भाजपा पुन्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमने- सामने आले आहेत. आजच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकारच्या नौटंकीचा पर्दापाश झाला आहे. अशी टीका पाडळकरांनी केली आहे.

आधी इंपेरिकल डेटा गोळ करा आणि मगच अध्यादेश काढा असे वारंवार सांगितले जाते पण नावापुरता अध्यादेश काढला जातो. सुरुवातीपासून ओबीसीचा पुळका असल्याचे दाखविले जाते. वेळ असताना जर आयोगाला बसायला खुर्ची दिली असती, मानधन दिले असते तर आज ही वेळ आली नसती. बहुजनांचे हक्क हिरावले गेले नसते. मी बहुजणांना आव्हान करतो आपले हक्क घेतल्या शिवाय मिळणार नाहीत. असे आवाहन त्यांनी ओबीसी समाजाला केले आहे.