पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांच्यावर कारवाई केल्यानंतर मराठी पत्रकारांच्या प्रतिक्रिया वाचल्या का ?

मुंबई – मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी संजय राऊत यांना अटक करण्यात आली.

गोरेगावातील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने खासदार संजय राऊत यांना अटक केली. संजय राऊत यांना अटक केल्यानं शिवसेनेला मोठा झटका मानला जात आहे. मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊतांच्या अटकेनंतर आता राजकीय वर्तुळातून पडसाद उमटू लागले आहेत. सोबतच पत्रकारांनी देखील या मुद्द्यावर भाष्य केले आहे. अनेकांनी या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले आहे. पाहूयात काही निवडक प्रतिक्रिया.