Marathi movies | ‘बंधू’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांची जबरदस्त जोडी एकत्र

Marathi movies | 'बंधू' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांची जबरदस्त जोडी एकत्र

सान्वी प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत ‘बंधू’ या मराठी चित्रपटाचं (Marathi movies) चित्रीकरण फलटण आणि वाई मध्ये धडाक्यात सुरू झालं आहे. चित्रपटाच्या सेटवर चित्रीकरणाची सुरुवात करत नुकताच मुहूर्त सोहळा पार पडला.यावेळी दिग्दर्शक, निर्माते यांच्याबरोबर कलाकारही उपस्थित होते.चित्रीकरणाला सुरुवात झाली म्हणजेच आता लवकरात लवकर चित्रपट आपल्या भेटीला येणार याबाबत काही शंका नाही.

‘आटपाडी नाईट्स’, ‘सरला एक कोटी’ च्या यशानंतर लेखक – दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर यांच्याकडून पुन्हा एकदा वेगळा विषय हाताळण्यात आला आहे. ‘बंधू’ या चित्रपटातून आपल्याला उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी या दोन कसलेल्या कलाकारांची जबरदस्त जोडी पाहायला मिळणार आहे. अॅनिमल या हिंदी चित्रपटानंतरच्या यशानंतर आता ‘ बंधू ‘ या आगळ्यावेगळ्या चित्रपटातून उपेंद्र लिमये हा एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. जिथे राम आहे.. तिथे लक्ष्मण तर येणारच असं त्याला टॅगलाईन देण्यात आलं आहे. यावरुनच ही दोन भावांमधील प्रेमाची गोष्ट आहे हे आपल्याला समजते. लवकरच भावांमधील ही अनोखी प्रेमकथा आपल्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाबद्दल (Marathi movies) सांगताना लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी सांगितले की, मी नेहमीच सामाजिक आरोग्य सुधरवणारे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करतो.समाजाच्या आरोग्याचं नुकसान होईल अशा आशयाचे चित्रपट मी हाताळत नाही. या आधी मी पती – पत्नीवर आधारित चित्रपट केले आहेत. तर आता ‘बंधू’ च्या निमित्ताने मी भावाभावांमधील प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.आताच्या सोशल मिडिया आणि स्पर्धात्मक युगामध्ये नाती दूर होत चालली आहेत. त्यामुळे भावाभावांच्या नात्यावर भाष्य करणे मला गरजेचे वाटले. दुरावलेली नाती प्रेमाच्या ओल्याव्याने कशी जवळ येतात हे ‘बंधू’ या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.

या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर हे असून निर्माती आरती चव्हाण या आहेत. कार्यकारी निर्माता विनोद नाईक आहेत. तर प्रोजेक्ट हेड वैभव शिरोळकर आहेत. सिनेमॅटोग्राफर म्हणून हर्षद आत्माराम गायकवाड हे लाभले आहेत. संगीत विजय नारायण गावंडे यांचे आहे. तर गीतरचनेची धुरा गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांनी सांभाळली आहे. कला दिग्दर्शक नितीन गणपत बोरकर हे आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Sunil Tatkare | There was Propoganda That Will Trail in Alibaug, Indebted to Alibaugkars For Exterminating Propaganda

Sunil Tatkare | There was Propoganda That Will Trail in Alibaug, Indebted to Alibaugkars For Exterminating Propaganda

Next Post
Eknath Shinde | मुख्यमंत्री पुन्हा ठरले अपघातग्रस्तांसाठी देवदूत, विक्रोळीजवळील अपघातग्रस्त तरुण आणि महिलेला पुरवली मदत

Eknath Shinde | मुख्यमंत्री पुन्हा ठरले अपघातग्रस्तांसाठी देवदूत, विक्रोळीजवळील अपघातग्रस्त तरुण आणि महिलेला पुरवली मदत

Related Posts

ईडीचे सरकार महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दळभद्री सरकार – नाना पटोले

मुंबई – सीमाभागात कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जाणीवपूर्वक वातावरण बिघडवत असून मराठी लोकांना मारहाण करुन त्यांच्या संपत्तीचे नुकसान…
Read More
Vishal Agarwal | ड्रायव्हरला खोटा जबाब द्यायला भाग पाडल्याने विशाल अग्रवाल अडचणीत, आणखी दोन गुन्हे दाखल होणार

Vishal Agarwal | ड्रायव्हरला खोटा जबाब द्यायला भाग पाडल्याने विशाल अग्रवाल अडचणीत, आणखी दोन गुन्हे दाखल होणार

Vishal Agarwal | कल्याणी नगर अपघात प्रकरण दिवसेंदिवस हे प्रकरण जास्तच चिघळत चालले आहे. पोर्श कारने दोन दुचाकीस्वारांना…
Read More

‘पक्ष कोणाची मक्तेदारी राहु शकत नाही, जिकडे कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी तिकडे तो पक्ष होऊ शकतो’

Shivsena :  शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला आहे. (The…
Read More