Murlidhar Mohol : पहलगाम (Pahalgam Terrorist Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये ठिकठिकाणी भारतीय पर्यटक अडकले असून त्यांना पुन्हा आणण्यासाठी केंद्रीय मंत्री व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) विशेष व्यवस्था करत आहेत. आपल्या घरात लग्नाचा सोहळा सुरू असतानाही त्यांनी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी स्वतंत्र वॉर रूम उभारली आहे.
गेल्या ५० तासांहून अधिक काळ, मोहोळ यांनी सातत्याने प्रशासनाशी समन्वय साधून नागरिकांसाठी प्रवास, निवास आणि अन्य आवश्यक मदतीची व्यवस्था केली. पहलगाममधून विविध राज्यांतील नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने मोहोळ हे मदतकार्याचे नेतृत्व करत आहेत.“प्रथम देश, मग बाकी सगळं” या भावनेतून काम करताना मोहोळ यांनी कौटुंबिक कार्यक्रमापेक्षा कर्तव्याला प्राधान्य दिल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं. त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.