‘शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे मोदी सरकार आणि त्यांच्या उद्योगपती मित्रांना आज माघार घ्यावी लागली’

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. त्यात नुकतीच त्यांनी तीन कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केली तसेच देशाची माफीही मागीतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाश पर्व सोहळ्याचं निमित्त साधून देशाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देताना तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरवात झाली आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील ट्विट करून शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे, तर मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. ‘आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे अभिनंदन!! शेतकऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण संघर्षापुढे मोदी सरकार आणि त्यांच्या उद्योगपती मित्रांना आज माघार घ्यावी लागली. भारतीयांनी यातून बोध घेणे गरजेचे आहे,जर आपण एकत्रपणे लढलो तरच भाजपच्या फॅसिस्ट सरकारपासून लोकशाही वाचवता येईल’ अस विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

दरम्यान, आमचं सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी पावलं उचलत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक सुधारावी आणि त्यांची सामजिक स्थिती चांगली व्हावी म्हणून इमानदारीने काम करत आहोत. आम्ही त्यासाठी तीन कृषी कायदे आणले होते. देशातील छोट्या शेतकऱ्यांना बळ मिळावं. त्यांना पिकांना योग्य दाम मिळावा आणि उत्पादन विक्रीसाठी बाजार मिळावा हा त्यामागचा हेतू होता. ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती. अनेक सरकारांनी यापूर्वी त्यावर मंथन केलं होतं. यावेळीही संसदेत चर्चा झाली आणि कायदा आणला. देशातील कोट्यावधी शेतकरी आणि संघटनांनी त्याचं स्वागत केलं. मी त्यांचा आभारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.

https://youtu.be/3AmlxDP4tcU

Previous Post

प्रीती झिंटानंतर सलमान चा नंबर लवकरच होणार बाबा?

Next Post

‘बळीराजाने आज सिद्ध केलं, मोडेन पण वाकणार नाही… दिल्लीच्या तख्ता पुढे झुकणार नाही’

Related Posts
करमाळा

करमाळा तालुक्यातील शेकडो महिलांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश

करमाळा – महात्मा गांधी जयंती चे निमित्त साधून मलवडी येथे करमाळा तालुक्यातील अनेक महिला भगिनींनी महिला तालुकाध्यक्ष स्वाती…
Read More
नाना

पंतप्रधानांनी निवडणूक प्रचारातून वेळ काढून विद्यार्थ्यांकडेही लक्ष द्यावे – नाना पटोले 

मुंबई – रशिया–युक्रेन युद्ध पेटले असताना भारतातील जवळपास २० हजार विद्यार्थी तेथे अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १२०० विद्यार्थी आहेत.…
Read More
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादीचा सरकारविरोधात हल्लाबोल; जयंत पाटलांची शेतकरी आक्रोश मोर्चाची घोषणा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादीचा सरकारविरोधात हल्लाबोल; जयंत पाटलांची शेतकरी आक्रोश मोर्चाची घोषणा

Jayant Patil:- दुष्काळ, नापिकी, अवकाळी पाऊस आणि शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांविषयी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस…
Read More