मोदी सरकारने ताबडतोब आपले भारतीय सैन्य श्रीलंकेत पाठवावे कारण… 

नवी दिल्ली-  आर्थिक आणि राजकीय संकटात श्रीलंकेत (Sri Lanka) अशांतता आहे. लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत. याबाबत भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी (BJP MP Subramaniam Swamy) म्हणाले की, मोदी सरकारने (Modi GOV) तेथे भारतीय सैन्य (Indian Army) पाठवावे कारण तेथील परिस्थितीमुळे भारताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

एका ट्विटमध्ये (Tweet) ते म्हणाले, भारताने घटनात्मक पावित्र्य पुनर्संचयित करण्यासाठी श्रीलंकेत भारतीय सैन्य पाठवून हस्तक्षेप केला पाहिजे. सध्या जनतेच्या संतापाचा फायदा भारतविरोधी विदेशी शक्ती घेत आहेत. हा भारताच्या सुरक्षेला धोका आहे.

दुसरीकडे श्रीलंकेतील बिघडलेल्या परिस्थितीवर विरोधी पक्ष केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेजारील देशाच्या परिस्थितीतून काहीतरी शिकावे आणि त्यांनी आता सावरले पाहिजे असा सल्ला ते देत आहेत.