आघाडीत पुन्हा बिघाडी, कॉंग्रेसने दिला स्वबळाचा नारा !

मुंबई : राज्यात येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. आता या निवडणुका कॉंग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी एकत्र येऊन लढणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र यावर कॉंग्रेसने (Congress) आपली भूमिका जाहीर करत पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी कायमच स्वबळाची भूमिका घेतली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबई काँग्रेसच्यावतीने ऑगस्ट क्रांती मैदान येथे काँग्रेस स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप बोलत होते.

‘मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आणि आजही हेच सांगतो 236 जागांवर काँग्रेस उमेदवार निवडणूक लढवेल, असं भाई जगताप म्हणाले. काँग्रेसचं गतवैभव परत आणण्याचा आम्ही मुंबईत प्रयत्न करु, असंही भाई जगताप म्हणाले.