‘आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत, याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू’

भंडारा – राष्ट्रवादीने ( NCP) आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि भाजपासोबत गटबंधन (alliance with BJP)केले. त्यामुळे आम्ही आज त्यांना सत्तेपासून दूर ठेवले, असा गौप्यस्फोट कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी आज भंडारा येथे केलाआहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी ( Bhandara ZP President Election ) झालेल्या निवडणुकी नंतर ते माध्यमांशी बोलत ( Nana Patole on NCP ) होते.

नाना पटोले पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘आम्ही मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संपर्क केला होता. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले आणि पंचायत समितीच्या अध्यक्ष -उपाध्यक्ष निवडणुकी दरम्यान भाजपशी हात मिळवणी करीत आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. गोंदिया आणि भंडारामध्ये ज्या पद्धतीने भाजपा सोबत राष्ट्रवादी सत्ता स्थापन करीत आहे. त्यावरून राष्ट्रवादीची भूमिका नेमकी काय आहे, हे स्पष्ट होत आहे.

आम्ही भाजपाशी कधीही युती केली नाही, आज आम्ही चरण वाघमारे यांच्या विकास फाउंडेशनच्या सोबत केले असून भाजपाने त्यांच्यावर अन्याय केल्यानेच ते आज आमच्या सोबत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या (Congress) पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू! असं देखील ते म्हणाले आहेत.