आपलं भाषण ऐकायला कुणीच येणार नाही अशी भीती वाटल्यामुळे आदित्य ठाकरे पळाले का..?
मुंबई – उद्धव बाळासाहेब ठाकरे (Thackeray Faction) यांच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सिल्लोड मधील त्यांची नियोजित सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियोजित सभेपासून रणछोडदास कुणाला घाबरून पळाले..? असा सवाल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी विचारला आहे.
खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे आणि आपलं भाषण ऐकायला कुणीच येणार नाही अशी भीती वाटल्यामुळे ते पळाले का..? का आमच्या एका खासदारांचा आपण धसका घेतलात..?असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. आम्हाला सांगितले असते तर आम्ही तुम्हाला व्यासपीठ आणि खुर्च्या उपलब्ध करून दिल्या असत्या असा सल्ला म्हस्के यांनी आदित्य याना दिला आहे.