शिवसेनेची काल मुंबईत झालेली सभा म्हणजे लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा होती – नवनीत राणा

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबईत पार पडलेल्या सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या भाषणातून शिवसैनिकांचा (Shivsainik) उत्साह वाढवण्याचा प्रयत्न तर केलाच सोबतच ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व (Hindutva) , केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर (Misuse of central systems) त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Leader of Opposition Devendra Fadnavis and MNS chief Raj Thackeray) यांचा समाचार घेतला.

दरम्यान, कालच्या या सभेवर सत्ताधारी आणि विरोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या सभेमध्ये भाजपवर (BJP) झालेल्या टीकेनंतर आता शिवसेनेची काल मुंबईत झालेली सभा म्हणजे लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा होती, अशी घणाघाती टीका खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केली. आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शेतकऱ्यांच्या समस्या (Problems of farmers), बेरोजगारी (Unemployment) आणि लोडशेडिंग (Load shedding) यावर चकार शब्दही उच्चारला नाही. फक्त इतरांवर टीका करण्यासाठी ही सभा घेण्यात आली होती, असे नवनीत राणा यांनी म्हटले.

यावेळी नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. मुख्यमंत्री अडीच वर्षे कार्यालयात गेले नाहीत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी राज्याचा दौरा केला. पण उद्धव ठाकरे यांनी गेल्या अडीच वर्षांत उद्धव ठाकरे विदर्भातील कोणत्या गावात फिरले आणि शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न सोडवले, हे दाखवून द्यावे.असं आव्हान देखील त्यांनी दिले .