नेते सोडून जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस उध्दव ठाकरे यांच्याच मागे खंबीरपणे उभी – तपासे 

Sharad Pawar

मुंबई   –  बंडखोर आमदारांनी शिवसेना फोडली… मातोश्रीला दगाफटका केला… ठाकरे कुटुंबाचा विश्वासघात केला आणि स्वतःच्या कृतीला योग्य आहे हे दाखविण्यासाठी त्याचे खापर राष्ट्रवादीच्या माथ्यावर मारण्याचा हा केविलवाणा प्रयत्न रामदास कदम व काही बंडखोर नेत्यांचा असल्याचे जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे.

२०१९ मध्ये पवारसाहेबांनी (Sharad Pawar)राष्ट्रवादी – शिवसेना – कॉंग्रेस या तीन पक्षांची मोट बांधली आणि उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री केले. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगला कारभार केल्यामुळेच देशाच्या पाच टॉप मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव आले आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना सोडून जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस उध्दव ठाकरे यांच्याच मागे खंबीरपणे उभी आहे असेही महेश तपासे म्हणाले.

शिंदे गटाने (Shinde Group) शिवसेना फोडली याचे खरे सूत्रधार भाजप (BJP) असून २०१९ मधील जो राग आहे त्यातून हे षडयंत्र सुरू आहे. पोलीस बळ आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आमदार खासदार यांना भयभीत केले गेले आहे आणि यामध्ये उध्दव ठाकरे कसे चुकले हे दाखवण्याचा प्रयत्न आहे मात्र राज्यातील जनता व शिवसैनिक ज्यांना निवडून दिले त्यांनी मातोश्रीशी कशी गद्दारी केली हे पहात आहे असेही महेश तपासे म्हणाले.

आज शिवसेना फोडून शिंदे आपली शिवसेना (Shivsena)खरी आहे हे सांगत आहेत मग इतकी वर्षे मातोश्रीचं… स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची मेहनत… उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांची शिवसेना वाढीची मेहनत काहीच नाही का? असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे.

शिवसेना बंडखोर आमदारांनी जी कृती केली आहे ती कृती महाराष्ट्रातील जनतेच्या पचनी पडलेली नाही. उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी निष्ठावान सामान्य शिवसैनिक असल्याने त्यांच्यावर डायरेक्ट टिका न करता राष्ट्रवादीवर तोंडसुख घेण्याचे काम बंडखोर शिंदे गट करत आहे असेही महेश तपासे म्हणाले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, लोकसभा, विधानसभा यामध्ये महाविकास आघाडी एकत्रित प्रचार करेल व बंडखोरांना व रिमोट कंट्रोल चालवणार्‍या भाजपचा पराभव होईल ही भीतीही निर्माण झाली आहे असेही महेश तपासे (Mahesh Tapase)यांनी स्पष्ट केले.

Previous Post
Yashomati Thakur

गरीबानं कसं जगायचं, सांगाल का मोदीसरकार? यशोमती ठाकूर यांचा थेट सवाल  

Next Post
Sanjay RAut

‘संजयजी … काहीही संकट आलं की त्यात महाराष्ट्राला ओढून सहानुभूती मिळवण्याचे प्रकार आता बंद करा’

Related Posts
भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहिलेले असणार? बीसीसीआयचा धक्कादायक निर्णय

भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहिलेले असणार? बीसीसीआयचा धक्कादायक निर्णय

२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या  ( Champions Trophy 2025) अगदी आधी, टीम इंडियाच्या जर्सीवरून वाद निर्माण झाला होता. भारतीय…
Read More
Radhakrushn Vikhe Patil

शिवसेना म्हणजे भरकटलेलं जहाज, बेताल वक्तव्ये करणारे प्रवक्तेच शिल्लक राहणार-  विखे पाटील

नगर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या…
Read More
‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ म्हणत नवाब मलिक यांचा वानखेडेंना थेट इशारा

‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ म्हणत नवाब मलिक यांचा वानखेडेंना थेट इशारा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ म्हणत एनसीबीचे…
Read More