छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड राष्ट्रवादी काँग्रेस कदापि सहन करणार नाही – जयंत पाटील

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) इतिहासाशी संबंधित तथ्यांची मोडतोड राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कदापि सहन करणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हा कायमच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभा असलेला पक्ष आहे. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी मोडतोड कदापि सहन केली जाऊ शकत नाही.

चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट तयार करताना छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित पुरावे उपलब्ध असलेली तथ्ये जशीच्या तशी दाखवावीत, कुठेही इतिहासाशी छेडछाड करू नये असेही जयंत पाटील यांनी स्पष्टपणे बजावले आहे.