नितेश राणेंनी सोबतच्या पोलिसांना बाजूला ठेवून घरी जाऊन दाखवावं – वैभव नाईक

मुंबई – राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण विरोधी पक्षातील नेत्यांवर सत्ताधारी मंडळींकडून हल्ले करण्यात येत असल्याचे वारंवार समोर येत आहे. नुकताच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (MP Navneet Rana and MLA Ravi Rana) यांना पोलिसांनी  अटक  केल्यानंतर  त्यांना भेटायला आलेले भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे.

त्याआधी भाजप नेते मोहित कंभोज (Mohit Kambhoj)  यांच्यावर देखील शिवसैनिकांनी हल्ला केला होता. याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर(gopichand padalkar)  यांच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला झाला होता सोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devandra fadanvis) यांच्या गाडीवर सुद्धा चप्पलफेक करण्यात आली होती. या सर्व घडामोडी घडत असताना राष्ट्रपती राजवट लावली जावी अशी मागणी केवळ विरोधकच नव्हे तर सामान्य जनता देखील करू लागली आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. तुम्ही हल्ले करताना आम्ही शांत बसणार नाही असेही राणे म्हणाले. आता तांडव होणार, किती गुन्हे दाखल करायचे ते करा असा इशाराही राणे यांनी दिला. फक्त 24 तास गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी (Home Minister Dilip Walse Patil) पोलिसांना सुट्टी द्यावी. मग या हल्ले करणाऱ्यांना आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा देखील राणेंनी दिला. आम्ही विचारांची लढाई विचाराने करु, दगडाची भाषा दगडाने करु असेही राणे यावेळी म्हणाले. आता तांडव होणार, किती गुन्हे दाखल करायचे ते करा असे राणे यावेळी म्हणाले.

नितेश राणे यांनी हा इशारा दिल्यानंतर आता शिवसेनेकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक (Shiv Sena MLA Vaibhav Naik) यांनी नितेश राणे यांच्यावर चांगलाच निशाणा लगावला आहे. नितेश राणेंनी शिवसेनेला आव्हान देण्याचे काम केले आहे. नितेश राणेंनी आपल्यासोबत असलेल्या पोलिसांना बाजूला ठेवून घरी जाऊन दाखवाव असं आव्हान वैभव नाईक यांनी त्यांना दिले आहे.

नारायण राणे यांना महाराष्ट्राची सुरक्षा कमी पडली म्हणून त्यांनी केंद्राची सुरक्षा मागवली. अनेक भाजपच्या नेत्यांनी केंद्राची सुरक्षा मागितली आहे. त्यामुळे कोण कोणाला भीत आहे हे जनतेला आणि महाराष्ट्राला माहित असल्याचे वैभव नाईक म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत संयमी पद्धतीने महाराष्ट्राचा कारभार सुरु आहे. परंतू शिवसेनेला जर कोणी हिनवत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल असा इशारा यावेळी नाईक यांनी दिला.