भाजप-आरएसएसमध्ये संवादाची शक्यता नाही – राहुल गांधी

उदयपुर – निवडणुकीतील सततच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राजस्थानमधील उदयपूरमध्ये चिंतन शिविराचे आयोजन केले होते. या तीन दिवसीय चिंतन शिबिरात सर्व बड्या नेत्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी शेवटच्या दिवशी पक्षाच्या नेत्यांना संबोधित केले (Rahul Gandhi addressed the party leaders on the last day).

गांधी म्हणाले की, काँग्रेसच्या या शिबिरात जी चर्चा सुरू आहे, ती पाहून मला प्रश्न पडतो की, देशातील कोणत्या पक्षात अशी खुली चर्चा आणि संवाद आहे. भाजप आणि आरएसएस अशा गोष्टींना कदापि परवानगी देणार नाही (BJP and RSS will never allow such things), असा माझाही विचार होता. आपले अनेक नेते भाजपमधून पक्षात दाखल झाले आहेत. यशपाल आर्य यांचे नाव घेत राहुल गांधी म्हणाले की, त्यांनी मला सांगितले की भाजपमध्ये दलित असल्याने त्यांचा छळ झाला. मात्र काँग्रेसने पक्षात चर्चेची दारे नेहमीच खुली ठेवली आहेत, त्यामुळे पक्षावर रोजच हल्ले होत आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, आजही देशाच्या राजकारणात चर्चा किंवा संवाद होत नाही. काही दिवसांपूर्वी मी संसदेत म्हटले होते की भारत हा राज्यांचा संघ आहे. जिथे राज्ये मिळून केंद्र बनवतात. म्हणूनच राज्ये आणि जनतेला संवाद साधण्याची संधी दिली पाहिजे. तुम्ही भारतातील लोकांमध्ये संवाद साधू शकता किंवा हिंसाचाराचा मार्ग निवडू शकता.

राहुल पुढे म्हणाले की, हे एक कुटुंब आहे आणि मी तुमच्या कुटुंबाचा आहे. माझा लढा देशासाठी धोकादायक असलेल्या आरएसएस आणि भाजपच्या विचारसरणीविरुद्ध आहे (My fight is against the ideology of RSS and BJP which are dangerous for the country). हे लोक द्वेष पसरवणारे, हिंसाचार पसरवणारे… याच्या विरोधात मी लढतो आणि लढू इच्छितो. हा माझ्या आयुष्याचा लढा आहे. माझ्या प्रिय देशात एवढा संताप आणि हिंसाचार पसरू शकतो हे मी मानायला तयार नाही. आमच्या विरोधात मोठ्या शक्ती आहेत, आजकाल भारतातील सर्व संस्था… असे समजू नका की आम्ही एका पक्षाशी लढतो आहोत, आम्ही भारतातील प्रत्येक संस्थेशी लढतो आहोत. आम्ही देशातील सर्वात मोठ्या भांडवलदारांविरुद्ध लढत आहोत. पण तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, कारण हा देश सत्यावर विश्वास ठेवतो, परिस्थिती काय आहे हे देश समजून घेत आहे.

काँग्रेस नेत्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, मी या शक्तींना घाबरत नाही. मी आयुष्यात एक रुपयाही घेतला नाही. मला कसलीही भीती नाही. मी भारतमातेकडून एक पैसाही घेतला नाही. कधी कधी आमचे ज्येष्ठ नेते डिप्रेशनमध्ये जातात, कारण लढा सोपा नसतो. प्रादेशिक पक्ष ही लढाई लढू शकत नाहीत, कारण ही लढाई विचारसरणीची आहे. आरएसएसची विचारधारा काँग्रेसच्या विचारसरणीशी लढत आहे. भाजप काँग्रेसबद्दल बोलतो, पण प्रादेशिक पक्षाबद्दल बोलणार नाही. कारण प्रादेशिक पक्षाला आपली जागा आहे हे त्यांना माहीत आहे, पण ते भाजपला हरवू शकत नाहीत. कारण त्यांच्याकडे विचारधारा नाही. म्हणूनच ही लढत सोपी नाही. हा देशाच्या भवितव्याचा लढा आणि देश वाचवण्याचा लढा आहे. येणा-या काळात तुम्हाला दिसेल की भारतात आग भडकणार आहे, ते जितक्या संस्थांची मोडतोड करतील, धर्म-जातींमधील संवाद जितका नष्ट करतील, तितकी आग आणखी जोरात होईल. पण तो संवाद पुन्हा सुरू करणे हे काँग्रेस पक्षाचे काम आहे.