आता ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही!: नाना पटोले

मुंबई – इतर मागास वर्ग (ओबीसी) लोकसंख्येने मोठा आहे परंतु या समाज घटकाला योग्य न्याय मिळत नाही. संविधानाने जे हक्क दिलेले आहेत ते समाजाला मिळाले पाहिजेत त्यासाठी संघर्ष करू. आपल्या न्याय हक्क व मागण्यासांठी काँग्रेस पक्ष सदैव आपल्याबरोबर राहिल, आता ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या नवनिवयुक्त पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव व सहप्रभारी सोनल पटेल, सरचिटणीस देवानंद पवार, सरचिटणीस प्रमोद मोरे दिप्ती चवधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, ओबीसी समाजाने २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात मतदान करुन केंद्रात सत्ता दिली पण भाजपाने ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी काहीही केले नाही. भाजपाने ओबीसी समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला. ओबीसी समाज मागणारा नाही परंतु संविधानाने दिलेले हक्क समाजाला मिळाले पाहिजेत आणि हे अधिकार मिळत नाहीत तोपर्यंत संघर्ष करत राहु. ही लढाई मोठ्या शिताफिने लढावी लागणार आहे. ओबीसींच्या शिष्यवृत्तीसाठी १९९९ साली आपण आमदार असताना आग्रही मागणी करून त्याचा पाठपुरावा केला आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ओबीसी समाजातील मुलांना दहावीपर्यंत शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला असे पटोले यांनी सांगितले. भानुदास माळी यांची ओबीसी विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून ते राज्यात संघटन वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. हे संघटन उभे करुन काँग्रेस पक्षाची ताकद कशी वाढले यासाठी काम करा, असे आवाहनही पटोले यांनी केले.

माजी मंत्री सुनिल देशमुख व ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांचीही यावेळी भाषणे झाली.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड

Next Post

वडील संघाचे  विश्वासू, मुलगा वीस वर्ष नगरसेवक तरीही काँग्रेस प्रवेश निर्णय त्यांनी का घेतला?

Related Posts
मराठी कलाकार म्हणून महाराष्ट्रासाठी खूप काही करायचंय - नवीन प्रभाकर

मराठी कलाकार म्हणून महाराष्ट्रासाठी खूप काही करायचंय – नवीन प्रभाकर

नवीन प्रभाकरने आपल्या अनोख्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना नेहमीच हसवलं आहे. कॉमेडीच्या या बादशहाचा पैचान कोन’ हा विनोदी स्कीट…
Read More
Atlee Fees | 10, 20 किंवा 50 कोटी नाही, अल्लू अर्जुनच्या चित्रपटासाठी दिग्दर्शक ऍटलीने मागितली एवढी मोठी रक्कम

Atlee Fees | 10, 20 किंवा 50 कोटी नाही, अल्लू अर्जुनच्या चित्रपटासाठी दिग्दर्शक ऍटलीने मागितली एवढी मोठी रक्कम

Atlee Fees | शाहरुख खान आणि नयनतारा स्टारर जवान हा ॲटली याने दिग्दर्शित केला होता. या एका चित्रपटाने…
Read More

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे अधुरे स्वप्न होणार पूर्ण, पत्नी शिखा राजकारणात ठेवणार पाऊल!

देशातील सर्वात प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांचे 2022 मध्ये निधन झाले. कॉमेडियनच्या मृत्यूतून चाहते अद्याप पूर्णपणे…
Read More