प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ विधेयकाला प्रशासन आणि प्रभावी निर्णयक्षमतेच्या दिशेनं क्रांतिकारी पाऊल म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, या विधेयकामुळे देशाच्या प्रशासकीय कार्यक्षमतेत मोठा बदल घडेल आणि लोकशाही प्रक्रियेचा पाया अधिक मजबूत होईल.
भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यांच्या जागी नवीन कायद्यांच्या प्रस्तावाला राष्ट्रपतींनी विशेष महत्त्व दिलं. त्या म्हणाल्या, “भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे शिक्षेला केंद्रस्थानी न ठेवता न्यायाच्या भावनेला प्राधान्य देतात. ही व्यवस्था फौजदारी न्यायप्रणालीत महत्त्वपूर्ण सुधारणा घडवेल.”
राष्ट्रपतींनी (President Draupadi Murmu) संविधानामुळे देशाच्या प्रगतीला मिळालेली दिशा अधोरेखित केली. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाऱ्या वीरांच्या त्यागाचं स्मरण करत देशप्रेम आणि एकात्मतेचं महत्त्व अधोरेखित केलं. धाडसी आर्थिक सुधारणांमुळे भारताची प्रगतीची गती कायम राहील, असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रपतींनी डिजिटल पेमेंट्स आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) यासारख्या तंत्रज्ञानाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, “भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा जगातील सर्वोत्तम सुविधांपैकी एक आहे.”
राष्ट्रपतींनी देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या सैनिकांसह पोलिस आणि निमलष्करी दलांच्या साहसाचं आणि योगदानाचं कौतुक केलं. त्यांनी सर्वांना देशाच्या प्रगतीसाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं.राष्ट्रपतींच्या या संदेशाने संविधान सन्मान, आर्थिक प्रगती, न्यायव्यवस्थेतील सुधारणांसोबतच एकात्मता आणि एकसंधतेच्या महत्त्वावर भर दिला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली, पुढील ४ दिवसांचे सर्व दौरे रद्द
राष्ट्रपती मुर्मू ९४२ कर्मचाऱ्यांना पोलिसांना पदकांनी सन्मानित करतील, ज्यात ९५ शौर्य पदकांचा समावेश
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून सरसकट कर्जमाफी द्या; Supriya Sule यांची मागणी