Chandrashekhar Bawankule | शरद पवार यांचा मी सन्मान करतो. त्यांना दीर्घ राजकीय अनुभव आहे, परंतु त्यांनी या वयामध्ये अशा प्रकारचा खोटारडेपणा करणे, जनतेला कन्फ्युज करणे अयोग्य आहे. एक प्रकारे ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान आहे, अशी परखड टिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
राज्यात झालेला त्यांनी पराभव स्वीकारलं पाहिजे, असे सांगून बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, जेव्हा पराभव स्वीकारता येत नाही तेव्हा जनतेला कन्फ्युज करण्यासाठी व आपलं अपयश लपवण्याचं काम ते करत असून, जनतेने तर विधानसभामध्ये दाखवून दिले म्हणून ईव्हीएम मशीनवर दोष देऊन पुन्हा आपलं अपयश लपवण्याचे पाप पवार करत आहेत.
विधान भवन परिसरात बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule) माध्यमांशी बोलताना म्हणाले, विधानसभेमधील त्यांचा अत्यंत मोठा पराभव झाला आहे.जनतेने त्यांना नाकारले म्हणून आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पराभवाची भीती असल्यामुळे आपले जनमत वाचवण्याकरिता शरद पवार पुन्हा प्रयत्न करत आहेत आणि मारकडवाडीमध्ये आलेली जी लोक आहेत ती पवार यांची कार्यकर्तेमंडळी आहेत. मारकडवाडीतील जनता त्यात कुठे आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र नौटंकीला कंटाळला!
मला वाटतं जनतेला सगळ समजले आहे .महाराष्ट्र या नौटंकी ला कंटाळलेला आहे. महाराष्ट्र हा विकासाच्या बाजूने आहे. महाराष्ट्राला महायुतीकडून अपेक्षा आहे आणि महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र प्रचंड ताकदवान बनणार आहेत.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
“मी असताना महायुतीत राज ठाकरेंची काय गरज”, रामदास आठवलेंचा खोचक टोला
बीएमसी निवडणुकीत उद्धव एकटेच लढणार? महाविकास आघाडी तुटण्याचे मिळतायंत संकेत!
लातूरमधील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाची नजर! शेतकऱ्यांना पाठवल्या नोटीस