युतीचे सरकार येताच मोर्चे निघतात कसे? यामागचा बोलविता अन करविता धनी कोण?; प्रवीण अलई यांचे थेट खटक्यावर बोट
Mumbai – विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढलाय. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि समविचारी संघटनांच्या वतीने काढण्यात आला आहे. यावर आज शेतकरी प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात दुपारी तीन वाजता बैठक होणार होती.. मात्र ही बैठक आता उद्या दुपारी होणार आहे.
दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे सरकार असताना एकही मोर्चा न काढणारे शेतकरी शिंदे फडणवीस सरकार येताच मोर्चे का काढू लागले आहेत असा सवाल उपस्थित होत आहे. यामागे नेमकं कोण आहे असा देखील सवाल उपस्थित होत आहे. तशा पद्धतीचे अनेकांनी सवाल देखील उपस्थित केले आहेत. याबाबत भाजपनेते प्रवीण अलई (Pravin Alai) यांनी ट्वीट करत थेट खटक्यावर बोट ठेवले आहे.
ते म्हणाले, जनतेला विचलित करणारी स्थिति..राज्यात राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि महाविकासआघाडी ची सरकारे होती,त्यावेळी सर्व काही अलबेल व समृद्ध होते का?शेतमालाला अतिरिक्त भाव होता का? यामागचा बोलविता अन करविता धनी कोण? शेतकरी राजा कर्ज मुक्त झाला होता का? पाण्याचे प्रश्न संपुष्टात आले होते का? नाही तर…. मग भाजपा- युतीचे सरकार येताच मोर्चे निघतात कसे? यामागचा बोलविता अन करविता धनी कोण?? विचारतोय महाराष्ट्र… असं त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.
शेतकरी राजा कर्ज मुक्त झाला होता का? पाण्याचे प्रश्न संपुष्टात आले होते का?
नाही तर…. मग भाजपा- युतीचे सरकार येताच मोर्चे निघतात कसे?यामागचा बोलविता अन करविता धनी कोण??#विचारतोयमहाराष्ट्र @NCPspeaks @INCMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
२/२.— Pravin Alai (प्रविण अलई) (@PravinAlai) March 14, 2023
शेतकरी मोर्चाबाबत प्रश्न उपस्थित करणारे इतर काही ट्वीटस
ज्या ज्या शेतकरी संघटनांनी 2014 ते 2019 या काळात @Dev_Fadnavis मुख्यमंत्री असताना वाट्टेल तेवढे मोर्चे काढले त्या संघटनांनी गेल्या 2.5 वर्षांमध्ये @OfficeofUT हे मुख्यमंत्री असताना एकही मोर्चा काढल्याचे आठवत नाही.
जसं भाजपा पुन्हा सत्तेत आली तसं लगेच मोर्चेकरांना जाग आली आणि…
— Piyush Jagdish Kashyap (@TheRSS_Piyussh) March 14, 2023
खरंतर सगळ्यांनीच बघितलय पण असं दाखवलं जातं की जुलै २०१९ ते जुलै २०२२ पर्यंत सगळं नंदनवनच होतं
भाजप सरकार आलं की ४ गोष्टी प्रामुख्याने दिसतात
🔸सरकारी संप
🔸असंख्य मोर्चे
🔸भूमिपुत्र विषय
🔸बळीराजा विषययेऊन फक्त ७ महिने झाले तर हे सुरू
म्हणजे जेव्हा कांग्रेस राष्ट्रवादी…
— Chandrabhushan (CJ) (@MatruBhakt) March 14, 2023
चला चला सत्ता गेली …मोर्चे काढायचे वेळ झाली …महविकास आघाडीच्या काळात संपकरी, मोर्चे करी कुठे लपून बसले होते नक्की….शेतकऱ्याचे प्रश्न आजचे नाहीच आहे …पण सत्ता बघून मोर्चे काढणारा शेतकरी ???? शेतकरी नावाला कलंक लावत आहे काही जातीयवादी पक्ष.
— PATIL 🚩🚩 (@ind_LN) March 14, 2023
सत्ता बदल झाला तरी वाटत होते अजून शेतकरी मोर्चे कसे सुरू नाही झाले!!
पश्चिम महाराष्ट्राची सत्ता असली तर मोर्चे होत नाहीत सर्व-सामान्यपणे!!— Left&Right (@LeftokRight) March 13, 2023
३०० रुपये घेणार नाही म्हणत शेतमाल मातीत घालू ही वृत्ती अतिशय माजोरी आहे. शेतकरी गेल्या १० वर्षात कधी रस्त्यावर येत नव्हता कारण हे मोर्चे अणि रास्ता रोको करणारे व करवून घेणारे सत्तेत होते.
— भारतीय (@DMarulkar) March 13, 2023
शेतकरी मोर्चा परत निघणार कदाचित. हेच तर miss केले मागची २.५ वर्ष. Bjp सरकार आले की लगेच मोर्चे चालू होता
— AMEY GORE🇮🇳🚩 (@Amey11102616) March 12, 2023
ब्लॉग उपडेट!
माहिती गोळा करत असताना एक गोष्ट सापडली ती म्हणजे जानेवारी २०२० ते ऑगस्ट २०२२ दरम्यान शेतकरी आत्महत्यांचा आकडा ७१६५.
या काळात या संदर्भात झालेली मोठी, राज्यव्यापी, लक्षवेधी आंदोलने आणि मोर्चे झालेली असतील तर नक्की सांगा #DevendraFadnavis https://t.co/n9Y2P9JBW8
— Rohit Bapat (हृद्रोग) 🇮🇳 (@rhtbapat) March 9, 2023