Prakash Ambedkar : नामांतराच्या वेळेसारखी परिस्थिती निर्माण झाली, महाराष्ट्रात शांतता राहिली पाहिजे

Prakash Ambedkar : नामांतराच्या वेळेसारखी परिस्थिती निर्माण झाली, महाराष्ट्रात शांतता राहिली पाहिजे

Prakash Ambedkar : सध्याची परिस्थिती चांगली नाही. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास नामांतर आंदोलनावेळी जी परिस्थिती निर्माण झाली होती. तीच परिस्थिती आता मराठा-ओबीसींमध्ये झाल्याची दिसून येत असून हे दुर्दैव असल्याची खंत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी बोलून दाखवली. ते नांदेड येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

ॲड. आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत आरक्षण बचाव यात्रेचा हेतू सांगताना म्हटले की, आरक्षण बचाव यात्रेचा हेतू शांतता प्रस्थापित राहणे हा आहे. वंचित बहुजन आघाडीशिवाय शांतता कोणीच प्रस्थापित करु शकत नाही, अशी परिस्थिती आहे. आज महाराष्ट्रात भीतीचे वातावरण आहे, असे मला वाटते.

काही राजकीय पक्ष आता पळवाटा काढत आहेत. तुम्ही जरांगेना काय शब्द दिला तो सांगा, लक्ष्मण हाके यांना काय शब्द दिला तो सांगा, असे प्रश्न उपस्थित करत आहेत. आमचे म्हणणं सरळ आहे प्रत्येक पक्षाला स्वत: ची भूमिका असणे आवश्यक आहे. जरांगे पाटील जी मागणी करत आहेत. ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या, प्रश्न एवढाच आहे की द्यायचा की नाही द्यायचा. महाराष्ट्राच्या शांततेसाठी आणि सामाजिक सलोखा अबाधित राहण्यासाठी राजकीय पक्ष आपला निर्णय जाहीर करतील, अशी अपेक्षा बाळगत असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले.

ॲड. आंबेडकर प्रस्थापित पक्षांना धारेवर धरताना म्हणाले की,  जनमाणसामध्ये जी भावना आहे ती म्हणजे एनसीपी आणि काॅंग्रेस हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहे. तसेच, भाजप  हा वैदिक ब्राम्हणांचा पक्ष आणि शिवसेना (उबाठा) हा सीकेपीचा पक्ष आहे. याचा अर्थ ओबीसी समाजाशी यांचा संबंध नाही. हे भूमिका घेणार नसतील. तर यांना मागसावर्गीयांना दिलेले अधिकार राहिले काय आणि न राहिले काय याच्याशी काहीही देणं-घेणं नाही.

ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, बाबासाहेबांनी जो इशारा दिला होता की राजकारणामध्ये जातीयतेचे राजकारण प्राबल्य होणार नाही याची दक्षता घ्या. उलट आता जातीय राजकारण प्रबळ होत आहे आणि हा धोका आहे, असे मला वाटते.

महत्वाच्या बातम्या-

Nana Patole | काँग्रेस पक्ष महाराष्ट्राचा स्वाभिमान राखणार, राज्याला गुजरातचा गुलाम होऊ देणार नाही

K. C. Venugopal | महाविकास आघाडी एकत्र विधानसभा निवडणूक लढणार आणि महाभ्रष्ट महायुती सरकार उखडून फेकणार

Suryakumar Yadav | सूर्यकुमार यादवला टी20 संघाचा कर्णधार बनणं पडलं महागात! वनडेतून झाला बाहेर

Previous Post
200 रुपयांत क्रिकेट खेळायचा Hardik Pandya, आता 170 कोटींच्या संपत्तीचा बनलाय मालक

200 रुपयांत क्रिकेट खेळायचा Hardik Pandya, आता 170 कोटींच्या संपत्तीचा बनलाय मालक

Next Post
भारताला पाकिस्तानात जावेच लागणार! Champions Trophy आयोजनावरुन पाकची आयसीसीला चेतावणी

भारताला पाकिस्तानात जावेच लागणार! Champions Trophy आयोजनावरुन पाकची आयसीसीला चेतावणी

Related Posts
प्रभास

प्रभासच्या चाहत्यांनाही त्याच्याशी संबंधित या सिक्रेट 10 गोष्टी माहीत नसतील, काहींना नक्कीच धक्का बसेल

मुंबई – ‘बाहुबली’ द्वारे जगभरात ओळख मिळवणारा प्रभास त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो.प्रभासचे खरे नाव व्यंकट सत्यनारायण प्रभास…
Read More
माळीणची पुनरावृत्ती : इर्शाळवाडी गावावर दरड नव्हे दु:खाचा डोंगर कोसळला,संपूर्ण देश हादरला

माळीणची पुनरावृत्ती : इर्शाळवाडी गावावर दरड नव्हे दु:खाचा डोंगर कोसळला,संपूर्ण देश हादरला

रायगड – रायगड जिल्ह्यात खालापूर इथं इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला,…
Read More

हे माहितीय का? भारतातील ‘या’ शहरात बटाटा-कांद्याच्या भावात विकले जातात काजू

Cashew: काजू हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ड्रायफ्रुट्समध्ये (Dry Fruits) काजू हे असे एक ड्रायफ्रूट आहे, जे जवळपास…
Read More