Prakash Ambedkar | ‘मनोज जरांगे विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी राज्यात एक नौटंकी सुरू आहे’

Prakash Ambedkar | 'मनोज जरांगे विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी राज्यात एक नौटंकी सुरू आहे'

Prakash Ambedkar | एससी, एसटी यांचे आरक्षण हे संविधानिक आहे. ओबीसींच्या आरक्षणाला संविधानिक दर्जा नाही. व्ही. पी. सिंग पंतप्रधान असताना त्यांनी काँग्रेस आणि भाजप यांना विचारले होते की, ओबीसी आरक्षणाला संविधानिक दर्जा देवू पण या दोन पक्षांनी भूमिका घेतली की, याला संविधानिक दर्जा द्यायचा नसल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोहोळ येथील आरक्षण बचाव यात्रेच्या सभेदरम्यान केले.

ओबीसी कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की, आपण ज्या पक्षात आहात त्या पक्षात राहून ओबीसींसाठी लढा द्यावा. तुम्ही आमच्यातच यावं अशी आमची मागणी नाही. पण तुम्ही ओबीसींना उमेदवारी मागितली पाहिजे.

धनगर, माळी किंवा अन्य ओबीसी समाजाचा मेळावा असेल तर लाखांनी लोक जमतात पण ओबीसींच्या नावाखाली 100 लोक सुद्धा जमत नाहीत. आता ओबीसींना राजकीय ओळख दाखवली पाहिजे. 7 तारखेच्या औरंगाबाद येथील सभेचा उद्देश एकच आहे की, यातून ओबीसींचा राजकीय चेहरा आपल्याला उभा करायचा आहे ते केले तरचं आपलं आरक्षण वाचणार असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

राज्यात एक नौटंकी सुरू आहे. ती म्हणजे मनोज जरांगे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असे नाटक दाखवले जात असल्याची टीकाही ॲड. आंबेडकर यांनी केली.

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे, ओबीसी नेते अविनाश भोसीकर, ओबीसी नेते रमेश बारस्कर यांच्यासह विविध ओबीसींच्या संघटना आणि त्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sharad Pawar : आरक्षणावर तात्काळ तोडगा निघावा ही आमच्या पक्षाची भूमिका, शरद पवारांची स्पष्टोक्ती

Piyush Goyal : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदी, पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

Prakash Ambedkar : राजकीय चेहरा दाखवू तरच आपण आरक्षण टिकवू; ॲड. प्रकाश आंबेडकर

Previous Post
Prakash Ambedkar | 'राज्यात जे वातावरण पेटले आहे, पवारांना त्यात पेट्रोल टाकून त्याचा भडका करायचा आहे'

Prakash Ambedkar | ‘राज्यात जे वातावरण पेटले आहे, पवारांना त्यात पेट्रोल टाकून त्याचा भडका करायचा आहे’

Next Post
Delhi News | कोचिंग सेंटरमध्ये पाणी कसे भरले? कोणी घेतला तीन विद्यार्थ्यांचा जीव; दिल्ली पोलीस काय म्हणाले?

Delhi News | कोचिंग सेंटरमध्ये पाणी कसे भरले? कोणी घेतला तीन विद्यार्थ्यांचा जीव; दिल्ली पोलीस काय म्हणाले?

Related Posts
Rohit Sharma | "बरं झालं सूर्याच्या हातात बॉल बसला, नाहीतर मी त्याला बसवला असता", कॅप्टन रोहितने घेतली फिरकी

Rohit Sharma | “बरं झालं सूर्याच्या हातात बॉल बसला, नाहीतर मी त्याला बसवला असता”, कॅप्टन रोहितने घेतली फिरकी

Rohit Sharma | विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा सत्कार सोहळा मायदेशी परतल्यापासून सुरू आहे. 4 जुलैला संध्याकाळी मुंबईत खुल्या…
Read More
शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा, ध्येय, धोरण नसलेला पोकळ अर्थसंकल्प :  सपकाळ

शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा, ध्येय, धोरण नसलेला पोकळ अर्थसंकल्प :  सपकाळ

मुंबई ( Harshvardhan Sapkal) | आजचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2025) हा शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा,…
Read More

या वयात असे कपडे शोभत नाहीत; जेष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता बोल्ड ड्रेसमुळे ट्रोल

चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज कलाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांचा…
Read More