‘सत्ताधाऱ्यांना फडणवीसांबद्दल किती पोटशूळ आहे हे रोज आपल्याला बघायला मिळते’

darekar - fadnvis

मुंबई : परमबीर सिंह फरार आहेत, असे शरद पवार म्हणतात, पण ज्यांची चौकशी सुरु आहे ते देशमुखही फरार आहेत. त्याच्यावर सोयीने आपण भाष्य केलेले नाही, असा पलटवार विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंह फरार आहेत असं नुकतेच शरद पवार म्हणाले होते. त्यावर दरेकरांनी पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.

तर, देवेंद्र फडणवीस यांना अजून वाटत नाही की, मी मुख्यमंत्री अजून नाही. या गोष्टींचे विस्मरण त्यांना होत नाही हे कमालीचे आहे. मी फडणवीस यांचे अभिनंदन करतो असा उल्लेख पवार यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना दरेकर म्हणाले की, कोणत्याही मुख्यमंत्र्यांना आपण मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचं विस्मरण होता कामा नये. यात या पदाचा मोठेपणा सांगण्याचा प्रयत्न होता, तो मिरविण्याचा नाही. त्यामुळे केवळ सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल किती पोटशूळ आहे हे रोज आपल्याला बघायला मिळते.

दरम्यान, यावर मलिक यांनी वक्तव्य करणे ठिक आहे, पण पवार साहेब यांनीही आपण चार वेळा मुख्यमंत्री होतो ही आठवण करुन द्यावी लागते. हे सत्ताधा-यांमधील पोटशूळ आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी त्या काळात अतिवृष्टीमुळे उध्दवस्त झालेल्या शेतक-यांनी उत्तम मदत मिळवून दिली. त्यामुळे फडणवीस हे विरोधी पक्ष नेते असले तरीही आजही राज्यातील जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे.

ते विरोधी पक्ष नेते म्हणूनच सत्ताधारी नेत्यांपैकी यशस्वी आहेत व राज्यातील जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्याचे काम ते करीत आहेत. ५ वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचे प्रगल्भ नेतृत्व फडणवीस यांनी केले आहे व आजही लोकाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची छबी उभी राहिली आहे. त्यामुळेच काही लोकांना पोटशूळ होत आहे व वेदना होत आहेत असा टोलाही दरेकर यांनी यावेळी लगावला.

हे देखील पहा

https://www.youtube.com/watch?v=-oKz-KhwmvA&t=4s

Previous Post
sadabhau khot

‘ऐट राजाची अन् वागणूक भिकाऱ्याची; सरकारने शेतकऱ्यांच्या शेतात गाढवाचा नांगर फिरविला’

Next Post
darekar - pawar

पवार साहेबांच्या अशा वक्तव्यामुळे ड्रग तस्करांच्या कारवायांना बळ मिळतंय – दरेकर

Related Posts
Vinod_Tawde

हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हा; विनोद तावडे यांचे आवाहन

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त होणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ (HAr Ghar…
Read More
Nitin Gadkari: तर ५ लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येईल, नितीन गडकरींना १०१% खात्री

Nitin Gadkari: तर ५ लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येईल, नितीन गडकरींना १०१% खात्री

Nitin Gadkari: महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील तिसर्‍या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे. रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर,…
Read More
Jayant Patil

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देणार – पाटील

मुंबई – ओबीसी (OBC) समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस…
Read More