नवी दिल्ली | ( All-party meeting) सध्याच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या संवेदनशील पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विविध मंत्रालयांचे आणि विभागांचे सचिव यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रीय सज्जता, आंतरमंत्रालयीन समन्वय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी सहकार्य यांचा आढावा घेण्यात आला. “सतत सतर्कता आणि कार्यवाहीतील सातत्य टिकवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावं,” अशी सूचना पंतप्रधानांनी दिली.
बैठकीत राज्य सरकारांशीही समन्वय ठेवण्याचा सल्ला ( All-party meeting) देण्यात आला. “राष्ट्रीय सुरक्षा आणि नागरिकांची सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक आहे. त्यासाठी आम्ही पूर्णतः कटीबद्ध आहोत,” असंही मोदी यांनी स्पष्ट केलं.
सर्वपक्षीय बैठक : सैन्याच्या कारवाईस पाठिंबा
‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सर्वपक्षीय बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करत सरकारला पूर्ण पाठिंबा दर्शवला, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.
या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, तसेच प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, संजय राऊत, श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक प्रमुख नेते आणि विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पाकिस्तानच्या संरक्षण प्रणालीवर हल्ला
दरम्यान, भारतीय लष्कराने काल सकाळी पाकिस्तानच्या लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणालीवर यशस्वी हल्ला केला असून ती प्रणाली निष्क्रिय करण्यात आली आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. “भारत, पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक आगळिकीला जशास तसं उत्तर देत आहे,” असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडली! भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने 50 ड्रोन्स पाडले
ज्याने पाकिस्तानला सळो की पळो केलं ते एस-400 सिस्टीम नक्की आहे तरी काय?
धरणही उद्ध्वस्त! सर्जिकल स्ट्राइकनंतर भारताची पाकिस्तानला दुसरी जोरदार चपराक